शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

झेंडू झाला मातीमोल

By admin | Updated: September 20, 2016 01:26 IST

उत्पादनात वाढ झाली असल्याने झेंडूला मातीमोल भाव मिळत आहे.

पुणे : उत्पादनात वाढ झाली असल्याने झेंडूला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे दररोज काही टन झेंडू शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागत असल्याचे चित्र मार्केट यार्डातील फुलबाजारात दिसू लागले आहे. सोमवारी तर सुमारे सात ते आठ टन झेंडू विक्री न झाल्याने कचऱ्यात टाकून दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सण-उत्सवांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली जाते. गणेशोत्सवामध्ये झेंडूला हमखास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. त्यामुळे अनेक शेतकरी त्यानुसार नियोजन करीत गणेशोत्सवात झेंडू विक्रीसाठी बाजारात आणतात. या वर्षी मात्र शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. मार्केट यार्डातील फुलबाजारात येणाऱ्या झेंडूला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने झेंडूच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक होत आहे. संपूर्ण गणेशोत्सवामध्ये झेंडूला प्रतिकिलो ५ ते २० रुपये एवढा कमी भाव मिळाला. >पितृपंधरवड्यामुळे फुलांच्या मागणीत घटआता पितृपंधरवडा सुरू झाल्याने फुलांच्या मागणीत आणखी घट झाली आहे. परिणामी झेंडूच्या विक्रीला चांगलाच फटका बसू लागला आहे. सोमवारी तब्बल सात ते आठ टन झेंडूची विक्री न झाल्याने फेकून द्यावा लागला. फुलबाजारात दुपारी झेंडूचे ढीग लागले होते. तुलनेने काही दिवसांपासून विक्री होत नसलेल्या झेंडूचा आकडा तिपटीने कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘बाजारात सोमवारी चार गोणी झेंडू आणला होता; पण काहीच विक्री झाली नाही. त्यामुळे फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. परत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च परवडत नाही. घरीही टाकून देता येत नाही,’ असे जेजुरी परिसरातील एका शेतकऱ्याने सांगितले.