शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मारियांना ‘सायोनारा’!

By admin | Updated: September 9, 2015 05:18 IST

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली.

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. जपान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी हा फेरबदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांना ‘सायोनारा’ (बाय-बाय) केल्याचे म्हटले जाते.दरम्यान, मारिया यांच्या अशा तडकाफडकी बदलीवर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून टीकेचा जोरकस सूर उमटल्याने शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडेच ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जपानला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री १० वाजता गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा करून मारिया व अहमद जावेद यांच्या फेरबदली आदेशावर सही केली. गृहविभागाने मंगळवारी तातडीने मारिया यांच्या पदोन्नती व बदलीचे आणि जावेद अहमद यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नेमण्याचे आदेश जारी केले. वास्तविक, मारिया यांची पदोन्नती सप्टेंबरअखेर होणार होती. मात्र, २२ दिवस (पान २ वर)विदेश दौऱ्यापूर्वी बदल्याविदेश दौऱ्यावर रवाना होताना बदल्या करण्याचा जणू प्रघातच मुख्यमंत्र्यांनी पाडला असून, असा अनुभव आज चौथ्यांदा आला. विदेश दौऱ्यावर जाताना ते महत्त्वाच्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात.अखेर जावेद यांना मिळाली संधीदीड वर्षापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीवरून बरेच राजकारण झाले. मारिया यांच्यासोबत अहमद जावेद हेदेखील शर्यतीत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहामुळे मारिया यांची वर्णी लागली. अखेर निवृत्तीपूर्वी पाच महिने का होईना जावेद यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. १९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद हे पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.यापूर्वी अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. १८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.मारियांची बदली का? राष्ट्रवादीचा सवालपदोन्नती देणे, बदली करणे हा सरकारचा अधिकार आहे. पण, सरकारकडून योग्य ती स्पष्टता झाली पाहिजे. राकेश मारिया हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. याकूब मेमनच्या दफनविधीच्या काळात त्यांनी शहरातील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती. सध्याच्या शीना बोरा प्रकरणाचा तपासदेखील योग्य रीतीने सुरू होता. त्यांची नियमानुसार ३० सप्टेंबर रोजी बदली होणार असताना अगोदरच अशा पद्धतीने तडकाफडकी बदली केली जाते. याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता झाली पाहिजे, असेही तटकरे म्हणाले. तर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेगळाच शोध लावला. ते म्हणाले, मारिया यांच्या बदलीमागे दिल्ली आणि गुजरातमधील बड्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे.मारिया रजेवरआकस्मिक बढतीमुळे नाराज झालेल्या मारिया यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतर ते किरकोळ रजेवर गेलेले आहेत. या निर्णयाबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.बदलीमागील कारणे?1 ) ललित मोदी प्रकरणात त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता; तरीही त्यांना तेथे ठेवले गेले. कारण सप्टेंबरमध्ये तशीही त्यांची बदली होणार होती.2) भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे मारिया यांची बदली ३० सप्टेंबरपर्यंत टाळण्याचे ठरले होते; मात्र शीना बोरा प्रकरणी मारिया अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास तपासच करू देत नव्हते. त्यांचा व्यक्तिगत ‘इंटरेस्ट’ अनेक प्रश्न निर्माण करत होता. 3) शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हा या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला.महिला-मुलांच्या सुरक्षेला प्राधान्यशहरातील कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मानजनक वागणूक मिळणे, या तीन बाबींवर आपले प्राधान्य राहणार आहे.- अहमद जावेद, पोलीस आयुक्त