शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेतकऱ्यांसाठी मार्ड सरसावले

By admin | Updated: September 19, 2015 04:16 IST

दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक

मुंबई : दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी मार्डने योजना आखल्या असून, मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्यता निधीत साडेचार लाख रुपयांचे निधी दिला आहे.राज्यात वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानाचा आघात सहन न करू शकलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारे मानसिक ताणाखालील शेतकऱ्यांना राज्यातील निवासी डॉक्टर आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. मानसशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना मराठवाड्यात जाण्याची संधी मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे पत्र पाठवले आहे. विदर्भातील काही ठिकाणीच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांचा मानसिक तोल ढासळण्यासाठी अनेक कारणे असतात. पण वेळीच त्यांच्या मानसिक तणावाचे निदान झाल्यास शेतकऱ्यांवर उपचार करून त्यांना ताणातून बाहेर काढता येऊ शकते. नांदेड, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षणासाठी मानसशास्त्र विभाग नाही. यामुळे मुंबई, पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी २५ विद्यार्थी बाहेर पडतात. शिक्षण घेणाऱ्या २-३ डॉक्टरांना १५ दिवसांसाठी त्या विभागात पाठवण्याची मागणी केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.मार्ड संघटना शेतकी कुटुंब दत्तक घेणारराज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील काही रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तर १० दिवसांमध्ये निवासी डॉक्टर जुने कपडे गोळा करणार असून शेतकरी कुटुंबांना देणार आहेत. डॉक्टरांकडे असलेली काही गरजेची औषधेदेखील या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. स्थानिक मार्ड संघटना त्यांच्या विभागातील एक शेतकरी कुटुंब दत्तक घेणार आहे. या कुटुंबाला सर्व मदत मार्डतर्फे केली जाणार आहे. याचबरोबर पुढचे तीन महिने स्थानिक मार्ड या कुटुंबाला ३ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.