शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: July 28, 2016 01:03 IST

जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे

औरंगाबाद : जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. पालखेड धरणाच्या कालव्यातूनही तब्बल १० दिवस मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पांच्या कालव्यातून सुमारे दोन टीएमसी पाणी पळविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार खाली जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी कालव्यांद्वारे हे पाणी वळविण्यात आले. सुरुवातीला नांदूर-मधमेश्वर आणि पालखेड धरणाचे कालवे सुरू करण्यात आले. त्यातील नांदूर- मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. नांदूर- मधमेश्वरच्या कालव्यातून श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत हे पाणी वळविले गेले आहे. पालखेड प्रकल्पाचा कालवाही १० दिवस सुरू होता. मात्र, हे पाणी वळविले जात असताना, जलसंपदा विभाग किंवा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्याही नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १०० क्युसेक्सआणि उजव्या कालव्यातून १५० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांमधून आतापर्यंत सुमारे २ टीएमसीपेक्षा जास्त पाणी वळविले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)जायकवाडी मृतसाठ्यातचवरच्या भागातून पाणी न आल्यामुळे जायकवाडी धरण अजूनही रिकामेच आहे. हे धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ३७ दलघमी पाण्याची गरज आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून सध्या धरणात १,६१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.म्हणे आरक्षणानुसार पाणी !गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी वरच्या भागात कालव्याद्वारे वापरले गेलेले पाणी समन्यायी पाणीवाटपाचा निर्णय घेताना विचारात घेतले जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘वरच्या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी म्हणून पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. त्यांच्या आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जात आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबर रोजी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटप केले जाईल. त्यामुळे कालव्यांद्वारे वापरलेले पाणी हिशोबात धरण्यात येईल. कालव्यांतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात येत आहे.’ वरच्या धरणांमध्ये ५२ टक्के साठाजायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील सरासरी जलसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरण ५८% भरले असून, गंगापूर धरण ७५ टक्के, नांदूर-मधमेश्वर बंधारा ८५ % आणि भावली प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील २१ सिंचन प्रकल्प सरासरी ५२ टक्के भरले आहेत.