शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: July 28, 2016 01:03 IST

जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे

औरंगाबाद : जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. पालखेड धरणाच्या कालव्यातूनही तब्बल १० दिवस मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पांच्या कालव्यातून सुमारे दोन टीएमसी पाणी पळविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार खाली जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी कालव्यांद्वारे हे पाणी वळविण्यात आले. सुरुवातीला नांदूर-मधमेश्वर आणि पालखेड धरणाचे कालवे सुरू करण्यात आले. त्यातील नांदूर- मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. नांदूर- मधमेश्वरच्या कालव्यातून श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत हे पाणी वळविले गेले आहे. पालखेड प्रकल्पाचा कालवाही १० दिवस सुरू होता. मात्र, हे पाणी वळविले जात असताना, जलसंपदा विभाग किंवा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्याही नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १०० क्युसेक्सआणि उजव्या कालव्यातून १५० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांमधून आतापर्यंत सुमारे २ टीएमसीपेक्षा जास्त पाणी वळविले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)जायकवाडी मृतसाठ्यातचवरच्या भागातून पाणी न आल्यामुळे जायकवाडी धरण अजूनही रिकामेच आहे. हे धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ३७ दलघमी पाण्याची गरज आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून सध्या धरणात १,६१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.म्हणे आरक्षणानुसार पाणी !गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी वरच्या भागात कालव्याद्वारे वापरले गेलेले पाणी समन्यायी पाणीवाटपाचा निर्णय घेताना विचारात घेतले जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘वरच्या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी म्हणून पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. त्यांच्या आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जात आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबर रोजी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटप केले जाईल. त्यामुळे कालव्यांद्वारे वापरलेले पाणी हिशोबात धरण्यात येईल. कालव्यांतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात येत आहे.’ वरच्या धरणांमध्ये ५२ टक्के साठाजायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील सरासरी जलसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरण ५८% भरले असून, गंगापूर धरण ७५ टक्के, नांदूर-मधमेश्वर बंधारा ८५ % आणि भावली प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील २१ सिंचन प्रकल्प सरासरी ५२ टक्के भरले आहेत.