शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

मराठवाडा अजूनही दुष्काळीच!

By admin | Updated: September 29, 2014 05:37 IST

महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे

पुणे : महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पावसाळी हंगामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठवाड्यात तुरळक पाऊस झाल्याने संपूर्ण वर्ष टंचाईच्या स्थितीचा सामना करावा लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीएवढा पाऊस झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. विदर्भात सरासरीच्या केवळ १२ टक्के पाऊस कमी झाला. तर मराठवाड्यात सरासरीच्या ३९ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात सर्वांत कमी म्हणजे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ४९, हिंगोली जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात ४०, जालना जिल्ह्यात ३५, बीड जिल्ह्यात ३४, वाशिम जिल्ह्यात ३० आणि चंद्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची प्रत्येकी २५ टक्के तूट आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ११, मुंबई उपनगरात सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला. (प्रतिनिधी)