शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मराठवाड्यात ५०० नव्हे, १४० फुटांवर लागते पाणी!

By admin | Updated: May 3, 2016 01:38 IST

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

- प्रमोद गवळी, नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे केंद्रीय भूजल मंडळ प्रादेशिक स्तरावर वर्षातून चार वेळा भूजल पातळी निगराणी करीत असते. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे केवळ १४० फूट खोल (४५.६२ मीटर) बोअरिंग केल्यावर पाणी लागते, असे निगराणीतून स्पष्ट झाले आहे. भूजल मंडळाने ही पातळी ‘कमाल’ असल्याचेही जाहीर केले आहे. १४० फुटापेक्षाही कमी खोलात पाणी लागू शकते असा याचा अर्थ होतो. हे रीडिंग जानेवारी (२०१६) मध्ये घेण्यात आले. नागलगावाला मानक ठरवून मंत्रालयाने मराठवाड्यात भूजल पातळी सामान्य असल्याचे मानले आहे. चिंता करण्याचे कारण नाही, असे मंत्रालयाला म्हणायचे आहे.केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून ही बाब समोर आली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. आता अशा प्रकारच्या निराधार प्रशासकीय उत्तरावर काय बोलायचे?मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती काही लपलेली नाही. आज लातूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात ३५० फूट बोअरिंग केल्यानंतरदेखील पाण्याचा पत्ता लागत नाही. भूजल मंडळाने सादर केलेला आकडा (१४० फुटांवर पाणी लागण्याबाबतचा) एकतर नदी किंवा टेकडीचा पायथा असलेल्या स्थळाचा आहे.नागलगाव या पर्वतीय भागात पाऊसदेखील साधारण बऱ्यापैकी पडतो. नागलगावसारखीच स्थिती अख्ख्या मराठवाड्याची स्थिती होय, असे मानले तर लातूर येथे मिरजमधून रेल्वेने पाणी आणण्याची आवश्यकताच काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु संपूर्ण मराठवाड्यातच किमान भूजल पातळी ५०० फूट खोल गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.समुद्र सपाटीपासून 1070मीटर उंचीवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात सध्या पाण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते हे पाहिले तर तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.