शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ५०० नव्हे, १४० फुटांवर लागते पाणी!

By admin | Updated: May 3, 2016 01:38 IST

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

- प्रमोद गवळी, नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे केंद्रीय भूजल मंडळ प्रादेशिक स्तरावर वर्षातून चार वेळा भूजल पातळी निगराणी करीत असते. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे केवळ १४० फूट खोल (४५.६२ मीटर) बोअरिंग केल्यावर पाणी लागते, असे निगराणीतून स्पष्ट झाले आहे. भूजल मंडळाने ही पातळी ‘कमाल’ असल्याचेही जाहीर केले आहे. १४० फुटापेक्षाही कमी खोलात पाणी लागू शकते असा याचा अर्थ होतो. हे रीडिंग जानेवारी (२०१६) मध्ये घेण्यात आले. नागलगावाला मानक ठरवून मंत्रालयाने मराठवाड्यात भूजल पातळी सामान्य असल्याचे मानले आहे. चिंता करण्याचे कारण नाही, असे मंत्रालयाला म्हणायचे आहे.केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून ही बाब समोर आली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. आता अशा प्रकारच्या निराधार प्रशासकीय उत्तरावर काय बोलायचे?मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती काही लपलेली नाही. आज लातूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात ३५० फूट बोअरिंग केल्यानंतरदेखील पाण्याचा पत्ता लागत नाही. भूजल मंडळाने सादर केलेला आकडा (१४० फुटांवर पाणी लागण्याबाबतचा) एकतर नदी किंवा टेकडीचा पायथा असलेल्या स्थळाचा आहे.नागलगाव या पर्वतीय भागात पाऊसदेखील साधारण बऱ्यापैकी पडतो. नागलगावसारखीच स्थिती अख्ख्या मराठवाड्याची स्थिती होय, असे मानले तर लातूर येथे मिरजमधून रेल्वेने पाणी आणण्याची आवश्यकताच काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु संपूर्ण मराठवाड्यातच किमान भूजल पातळी ५०० फूट खोल गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.समुद्र सपाटीपासून 1070मीटर उंचीवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात सध्या पाण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते हे पाहिले तर तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.