शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मराठवाड्यात ५०० नव्हे, १४० फुटांवर लागते पाणी!

By admin | Updated: May 3, 2016 01:38 IST

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

- प्रमोद गवळी, नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे केंद्रीय भूजल मंडळ प्रादेशिक स्तरावर वर्षातून चार वेळा भूजल पातळी निगराणी करीत असते. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे केवळ १४० फूट खोल (४५.६२ मीटर) बोअरिंग केल्यावर पाणी लागते, असे निगराणीतून स्पष्ट झाले आहे. भूजल मंडळाने ही पातळी ‘कमाल’ असल्याचेही जाहीर केले आहे. १४० फुटापेक्षाही कमी खोलात पाणी लागू शकते असा याचा अर्थ होतो. हे रीडिंग जानेवारी (२०१६) मध्ये घेण्यात आले. नागलगावाला मानक ठरवून मंत्रालयाने मराठवाड्यात भूजल पातळी सामान्य असल्याचे मानले आहे. चिंता करण्याचे कारण नाही, असे मंत्रालयाला म्हणायचे आहे.केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून ही बाब समोर आली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. आता अशा प्रकारच्या निराधार प्रशासकीय उत्तरावर काय बोलायचे?मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती काही लपलेली नाही. आज लातूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात ३५० फूट बोअरिंग केल्यानंतरदेखील पाण्याचा पत्ता लागत नाही. भूजल मंडळाने सादर केलेला आकडा (१४० फुटांवर पाणी लागण्याबाबतचा) एकतर नदी किंवा टेकडीचा पायथा असलेल्या स्थळाचा आहे.नागलगाव या पर्वतीय भागात पाऊसदेखील साधारण बऱ्यापैकी पडतो. नागलगावसारखीच स्थिती अख्ख्या मराठवाड्याची स्थिती होय, असे मानले तर लातूर येथे मिरजमधून रेल्वेने पाणी आणण्याची आवश्यकताच काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु संपूर्ण मराठवाड्यातच किमान भूजल पातळी ५०० फूट खोल गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.समुद्र सपाटीपासून 1070मीटर उंचीवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात सध्या पाण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते हे पाहिले तर तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.