शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मराठवाडा पाणीप्रश्नाचा निकाल राखला

By admin | Updated: April 17, 2016 01:38 IST

नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी

मुंबई : नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडू नये, यासाठी अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला नाशिक-नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे, अशी भूमिका घेणाऱ्याही अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.नाशिक- नगरच्या धरणांतून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी व शेतीकरिता १२. ६४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय गोदावरी- मराठवाडा जलसिंचन प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) गेल्यावर्षी घेतला. या निर्णयाला नाशिक-नगरच्या साखर कारखान्यांनी व स्थानिकांनी विरोध केला, तर जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात यावे, यासाठी मराठवाड्याच्या स्थानिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली.पाणीटंचाई असेल तर ती दोन्ही जिल्ह्यांना सहन करावी लागेल. मराठवाड्यात ज्वारीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यक तेवढे पाणी मराठवाड्याला पुरवण्यात येईल. पण त्याचबरोबर नाशिक- नगरकरांनाही आवश्यक पाणी पुरवण्यात येईल, असे सरकारने सांगितले. खंडपीठाने सगळयांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नाशिक - नगर व मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील निकाल राखून ठेवला. (प्रतिनिधी)पाण्यावर कोण्या एकाची मक्तेदारी नाहीदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पाण्यावर कोण्याची मक्तेदारी नाही. पिण्यासाठी पाणी पुरवण्यात आले तरीही मराठवाड्याला शेतीसाठी पाणी द्यावे लागेल. कारण जगण्याच्या अधिकारात अन्नाच्या अधिकाराचाही समावेश आहे.