शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

मराठवाडा पाणीप्रश्नाचा निकाल राखला

By admin | Updated: April 17, 2016 01:38 IST

नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी

मुंबई : नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडू नये, यासाठी अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला नाशिक-नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे, अशी भूमिका घेणाऱ्याही अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.नाशिक- नगरच्या धरणांतून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी व शेतीकरिता १२. ६४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय गोदावरी- मराठवाडा जलसिंचन प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) गेल्यावर्षी घेतला. या निर्णयाला नाशिक-नगरच्या साखर कारखान्यांनी व स्थानिकांनी विरोध केला, तर जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात यावे, यासाठी मराठवाड्याच्या स्थानिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली.पाणीटंचाई असेल तर ती दोन्ही जिल्ह्यांना सहन करावी लागेल. मराठवाड्यात ज्वारीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यक तेवढे पाणी मराठवाड्याला पुरवण्यात येईल. पण त्याचबरोबर नाशिक- नगरकरांनाही आवश्यक पाणी पुरवण्यात येईल, असे सरकारने सांगितले. खंडपीठाने सगळयांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नाशिक - नगर व मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील निकाल राखून ठेवला. (प्रतिनिधी)पाण्यावर कोण्या एकाची मक्तेदारी नाहीदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पाण्यावर कोण्याची मक्तेदारी नाही. पिण्यासाठी पाणी पुरवण्यात आले तरीही मराठवाड्याला शेतीसाठी पाणी द्यावे लागेल. कारण जगण्याच्या अधिकारात अन्नाच्या अधिकाराचाही समावेश आहे.