शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

‘जलयुक्त’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठवाड्याला सर्वाधिक निधी

By admin | Updated: November 7, 2016 06:08 IST

राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली

परभणी : राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाने विभागवार निधी संमत केला असून त्यातील सर्वात मोठा वाटा औरंगाबाद विभाग अर्थात मराठवाड्याला मिळाला आहे. शुक्रवारी निधी वाटपासंदर्भातील शासन निर्णय जलसंधारण विभागाच्या अव्वर सचिवांनी काढले.औरंगाबाद विभागातील १ हजार ५१८ गावांसाठी तब्बल १० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर पुणे विभागाला ६ कोटी ११ लाख, कोकण विभागाला १ कोटी २ लाख, नाशिक विभागाला ६ कोटी १८ लाख, नागपूर विभागाला ५ कोटी १४ लाख आणि अमरावती विभागाला ६ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्याला सर्वाधिक, तर सर्वाधिक पाऊस होणाऱ्या कोकण पट्ट्याला सर्वात कमी निधी संमत करण्यात आला आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून महात्मा जोतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानास उपलब्ध झालेला निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११-१२ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अभियानाला निधी देण्यास सुरुवात झाली. २०१६-१७ मध्ये याच योजनेतून ४० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान जलयुक्त शिवार अभियानासाठी वितरित केले जात आहे. त्यात ५ कोटी रुपयांचा निधी राज्यस्तरावरील प्रसिद्धीसाठी राखून ठेवला असून उर्वरित ३५ कोटी रुपयांचा निधी निवडलेल्या गावांसाठी संमत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)