शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

‘जलयुक्त’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठवाड्याला सर्वाधिक निधी

By admin | Updated: November 7, 2016 06:08 IST

राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली

परभणी : राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाने विभागवार निधी संमत केला असून त्यातील सर्वात मोठा वाटा औरंगाबाद विभाग अर्थात मराठवाड्याला मिळाला आहे. शुक्रवारी निधी वाटपासंदर्भातील शासन निर्णय जलसंधारण विभागाच्या अव्वर सचिवांनी काढले.औरंगाबाद विभागातील १ हजार ५१८ गावांसाठी तब्बल १० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर पुणे विभागाला ६ कोटी ११ लाख, कोकण विभागाला १ कोटी २ लाख, नाशिक विभागाला ६ कोटी १८ लाख, नागपूर विभागाला ५ कोटी १४ लाख आणि अमरावती विभागाला ६ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्याला सर्वाधिक, तर सर्वाधिक पाऊस होणाऱ्या कोकण पट्ट्याला सर्वात कमी निधी संमत करण्यात आला आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून महात्मा जोतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानास उपलब्ध झालेला निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११-१२ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अभियानाला निधी देण्यास सुरुवात झाली. २०१६-१७ मध्ये याच योजनेतून ४० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान जलयुक्त शिवार अभियानासाठी वितरित केले जात आहे. त्यात ५ कोटी रुपयांचा निधी राज्यस्तरावरील प्रसिद्धीसाठी राखून ठेवला असून उर्वरित ३५ कोटी रुपयांचा निधी निवडलेल्या गावांसाठी संमत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)