शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
4
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
5
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
6
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
7
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
8
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
9
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
10
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
11
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
12
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
13
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
14
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
15
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
16
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
17
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
18
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
20
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर

मराठवाड्यातील दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी

By admin | Updated: June 12, 2016 03:54 IST

ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.

लातूर : ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले. देशातील १७ राज्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यात कशा पद्धतीने नियोजन करावे़ तसेच तीन वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळाची प्रमुख कारणे काय?, याचा शोध आणि अभ्यास करण्यासाठी युनिसेफ व रेडआर या दोन संस्थांचे नऊ सदस्यांचे पथक बीड व लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ७ ते १० जून या कालावधीत लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात वांजरवाडा व उमरदरा, अहमदपूर तालुक्यातील काही गावांची पथकाने पाहणी केली. शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावांची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली़ पाणी साठविण्याच्या टाक्यांचेही त्यांनी निरीक्षण केले. पथकप्रमुख युसुफ कबीर, युधिष्ठीर पाणीग्रही, भारती ताहिल्यानी, वल्लरी अग्रवाल, मिनाक्षी झा, डॉ़ मंगेश गढरी, डॉ़ पुष्कर देशमुख, भाऊसाहेब पवार, डॉ़ समीर पेठे, शुभांगी गुरवे यांचा समावेश होता. मंगळवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला़ त्यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची चार वर्षांची माहिती संकलित केली. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याशीही युसुफ कबीर यांनी चर्चा केली़ (प्रतिनिधी)अहवाल बनविणारलातूर व बीड जिल्ह्यात केलेल्या पाहणीचा अहवाल तयार होणार आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे पथकातील सदस्य समीर पेठे यांनी सांगितले.