शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा

By admin | Updated: March 12, 2016 04:32 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते

नवी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते. यावेळी १०७ हुतात्म्यांना स्मरण करत त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले मराठी भाषिकांचे राज्य टिकवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.एपीएमसी येथे दी फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने संघटनेच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे त्याप्रमाणे मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा अशी गरज व्यक्त केली. मात्र इतर भाषिकांना आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु १०७ हुतात्म्यांच्या त्यागातून मराठी भाषिकांचे राज्य निर्माण झालेले असून, ते जतन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सुचवले. याचवेळी शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनाही उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीप्रश्न सुटून शेती होत असेल तर कुटुंबातील एकाने ती करा व दुसऱ्याने उद्योगाचा वसा नजरेसमोर ठेवत देशभरात व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तर शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांसंबंधीचे निर्णय एकटे सरकार घेवू शकत नसून, ते धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत बाजार समितीमधून फळे भाजीपाला वगळण्याच्या निर्णयातून व्यापाऱ्यांना दिलासा दिला.सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगितले. यामुळेच चर्चेविना या अधिवेशनात कायदा मंजुरीसाठी येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी गृहमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार शशिकांत शिंदे, संदीप नाईक, नरेंद्र पाटील, मंदा म्हात्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)