शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा

By admin | Updated: March 12, 2016 04:32 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते

नवी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते. यावेळी १०७ हुतात्म्यांना स्मरण करत त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले मराठी भाषिकांचे राज्य टिकवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.एपीएमसी येथे दी फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने संघटनेच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे त्याप्रमाणे मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा अशी गरज व्यक्त केली. मात्र इतर भाषिकांना आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु १०७ हुतात्म्यांच्या त्यागातून मराठी भाषिकांचे राज्य निर्माण झालेले असून, ते जतन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सुचवले. याचवेळी शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनाही उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीप्रश्न सुटून शेती होत असेल तर कुटुंबातील एकाने ती करा व दुसऱ्याने उद्योगाचा वसा नजरेसमोर ठेवत देशभरात व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तर शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांसंबंधीचे निर्णय एकटे सरकार घेवू शकत नसून, ते धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत बाजार समितीमधून फळे भाजीपाला वगळण्याच्या निर्णयातून व्यापाऱ्यांना दिलासा दिला.सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगितले. यामुळेच चर्चेविना या अधिवेशनात कायदा मंजुरीसाठी येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी गृहमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार शशिकांत शिंदे, संदीप नाईक, नरेंद्र पाटील, मंदा म्हात्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)