शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मराठी टक्का निश्चित वाढेल

By admin | Updated: September 5, 2016 03:26 IST

१०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल

ठाणे : १०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल, असे ज्येष्ठ पत्रकार आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश बाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. मराठा मंडळातर्फे सरस्वती शाळेच्या सभागृहात मार्च २०१६ च्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील ८० व अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी विद्यार्थ्यांनी या प्रशासकीय सेवांकडे पगाराची शाश्वती असलेल्या नोकरीचे साधन इतकाच दृष्टिकोन न ठेवता याकडे करिअर म्हणून पाहण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना प्रशासकीय परीक्षा, त्यांची पूर्वतयारी, देशसेवेची संधी याबाबतीत विस्तृत माहिती देताना ते म्हणाले की, संपूर्ण देशात ही एकमेव संस्था आहे, जिथे हे शिक्षण विनामूल्य दिले जाते. तसेच येथील वाचनालय अद्ययावत आहे. जिथे जगभरात लिहिली गेलेली पुस्तके महिनाभरात वाचनासाठी उपलब्ध होतात. फक्त येथे वसतिगृह नाही. त्यामुळेच ठाणे-मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांनी या संस्थेचा जास्तीतजास्त लाभ घेतला पाहिजे. लेखिका माधुरी ताम्हाणे यांनी ‘जगावं कसं आणि वागावं कसं’ या विषयावर मार्गदर्शन केले. १०-१२ वी पर्यंत शिक्षणाच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी गुणांच्या टक्केवारीचे महत्त्व आहे. परंतु, त्यानंतरच्या आयुष्यात यशस्वी करिअर करण्यासाठी आणि जीवनातील अत्युच्च ध्येय गाठण्यासाठी शिस्त, सातत्य, वक्तशीरपणा, नम्रपणा या गुणांचे महत्त्व टक्क्यांइतकेच आहे. किंबहुना जास्त आहे. टक्क्यांची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. एखादा छंद जोपासा, ज्यायोगे नेहमी ताजेतवाने राहाल आणि अभ्यासाचा ताण मेंदूवर येणार नाही.>परदेशात गेलात तरी मातृभूमीला विसरू नकाशिक्षण अथवा पैसे कमवण्यासाठी तुम्ही भावी आयुष्यात परदेशात गेलात तरी आपल्या मातृभूमीला आणि आईवडिलांना विसरू नका. संधी मिळताच येथे परत या, असा सल्ला मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी दिला. मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन अपर्णा साळवी, विनय परब, सयाजी मोहिते यांनी केले. रोख पारितोषिके, भेटवस्तू आणि सन्मानप्रमाणपत्र देऊन पावणेदोनशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.