शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मराठी साहित्य संमेलन निवडणुकीच्या प्रचारात रंगत

By admin | Updated: September 24, 2015 01:10 IST

सबनिस-वाघांमध्ये काट्याची टक्कर.

अकोला : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या फैरी चांगल्याच झडू लागल्या आहेत. विदर्भातील उमेदवार शेती-मातीचे कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाल सबनीस यांच्यात काट्याची टक्कर असून, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न दोघेही करीत आहेत. पिंपरी चिंचवड येथे होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस यांच्यासह प्रकाशक अरुण जाखडे, कवी शरणकुमार लिंबाळे व लेखक श्रीनिवास वारुंजीकर हे आपले भाग्य आजमावित आहेत. प्रत्येक उमदेवार आपणच संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य आहोत, हे मतदारांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या साहित्य वतरूळात जे चित्र आहे ते पाहता विठ्ठल वाघ व श्रीपाल सबनीस यांच्यातच टक्कर होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. सबनीस यांना मराठा साहित्य परिषदेचा खुला पाठींबा असला तरी, त्यांची संपूर्ण मदार आता आयोजक संस्था व विदर्भ साहित्य संघाच्या मतदारांवर अवलंबून असल्याचे दिसून येते. विठ्ठल वाघ लोकप्रिय कवी असले तरी साहित्यिक मतदारांमध्ये लोकप्रियता मिळविण्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. आजच्या घडीला विठ्ठल वाघांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील भागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या त्यांचा अविश्रांत प्रवास सुरु आहे. मतदारांचा कल कुणाकडे आहे, याचे चित्र येत्या आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात जेष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतदारांच्या भेटीला माझे प्राधान्य असून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असल्याचे सांगीतले. परराज्यातील मतदारांच्याही भेटी घेतल्या आहेत. लोकनेते शरद पवार यांनी नागपूर येथे शेती, मातीचा कवी म्हणून माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने, मी आश्‍वस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.