शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मराठी भाषा यायलाच हवी; अन्यथा राजद्रोह

By admin | Updated: May 30, 2017 05:28 IST

मीरा-भार्इंदर निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. रहिवासी दाखल्यासह महाराष्ट्राची राजभाषा मराठी लिहिता, वाचता आणि बोलता यायलाच हवी, अशी अट या निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सक्तीची करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने निवडणूक आयोगासह पालिका आयुक्तांना केली आहे. तसेच मराठी भाषा डावलणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.मराठीतून १०० टक्के कामकाज चालवणे मीरा-भार्इंदर महापालिकेला बंधनकारक असतानाही अगदी महापौर गीता जैन यांच्यासह अनेक नगरसेवक कामकाजात मराठीचा वापर पूर्णपणे करत नाहीत. पालिका अधिकारीदेखील मराठीला डावलताना दिसतात. दैनंदिन कामकाजात, जाहिराती, प्रसिद्धी, बॅनर, सूचना फलकांवरदेखील मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नाही. उलट, अन्य भाषांचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा आरोप एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.पालिकेत अनेक अमराठी नगरसेवक असून त्यांना मराठी येत नाही. काही अमराठी नगरसेवकांना मराठी चांगली येते आणि ते आवर्जून बोलतातदेखील. तरीही, मतांच्या राजकारणापोटी मराठीला सर्रास डावलले जाते. पालिकेत आणि पालिका कामकाजात मराठीची नियोजनबद्ध गळचेपी करून अन्य भाषेचा वापर केला जात आहे.आॅगस्टमध्ये पालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांना राजभाषा मराठी ही लिहिता, बोलता आणि वाचता येणे आवश्यकच आहे. अशाप्रकारे सक्ती केली तरच पालिकेचे कामकाज पुर्णपणे मराठी भाषेतुन चालणे शक्य होणार आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत मराठी बोलता, वाचता व लिहिता येण्याची तसेच रहिवास दाखल्याची सक्तीची अट टाकण्यात यावी, अशी मागणी केल्याचे देशमुख म्हणाले. पालिकेत अनेक अमराठी नगरसेवक असून त्यांना मराठी येत नाही. काही अमराठी नगरसेवक आवर्जून मराठीत बोलतातदेखील. तरीही, मतांच्या राजकारणापोटी मराठीला सर्रास डावलले जाते.