शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मराठी बांधवांनी योगदान द्यावे

By admin | Updated: July 5, 2015 02:12 IST

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून, त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्या मराठी मंडळींनी योगदान दिल्यास महाराष्ट्र सर्वोत्तम

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून, त्यात अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्या मराठी मंडळींनी योगदान दिल्यास महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य म्हणून नावारूपास येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथे केले. अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.अमेरिका आणि कॅनडामधे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे १७वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, की मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मेक इन महाराष्ट्र आवश्यक आहे़ कारण महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. मेक इन महाराष्ट्र हा आमचा केवळ नारा नाही, तर व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. महाराष्ट्र आणि अमेरिका जोडण्याचा प्रयत्न येथील मराठी मंडळींच्या माध्यमातून केला जाईल. त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने अमेरिकेत महाराष्ट्र परिचय केंद्र निश्चितपणे कार्यान्वित करण्यात येईल. यासोबतच बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि प्रस्तावित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनासाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ टक्के सवलत दिली जाईल. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. या तीन दिवशीय अधिवेशनात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत आहेत.राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन होत असून, रेड टेपऐवजी रेड कार्पेट संस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. यासोबत जलयुक्त शिवार अभियानासारख्या कार्यक्रमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या विकासयात्रेत मराठी मंडळींनी सहभागी व्हावे. त्यांच्या योगदानातून महाराष्ट्र एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारूपास येईल, असा आशावादही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.