शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

By admin | Updated: September 24, 2016 03:49 IST

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा

अहमदनगर : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, या आणि इतर मागण्यांसाठी आजवरच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा विराट असा मूक मोर्चा शुक्रवारी नगरमध्ये सकल मराठा समाजाने काढला. पावसाचे वातावरण असतानाही अवघा समाज या मोर्चासाठी एकवटला होता. कोपर्डी अत्याचाराची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आणि याच घटनेमुळे राज्यात सकल मराठा समाजाच्या मोर्चांची मालिका सुरू झाल्यामुळे येथील मोर्चाबाबत सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. उत्स्फूर्तपणे सहकुटुंब माणसे मोर्चात उतरली होती. नगर शहरात रात्रीपासूनच पावसाचे वातावरण होते. पण त्याची तमा न बाळगता पहाटेपासूनच मोर्चेकरी शहरात दाखल झाले. शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल तुडुंब भरले होते. तेथून मोर्चाचे व्यासपीठ असलेला चांदणी चौकापर्यंतचा रस्ता तसेच शहरातून जाणारे सातही महामार्ग गर्दीने व्यापले होते. या प्रत्येक महामार्गावर आठ किलोमीटरच्या परिसरापर्यंत मोर्चेकरी होते. लाखो लोकांना नगर शहरात प्रवेशही करता आला नाही. शहरातील अंतर्गत रस्तेही गर्दीने व्यापले होते. त्यामुळे शहर सकाळपासून अक्षरश: थांबून गेले होते. सर्वत्र भगवे ध्वज, ‘मराठा क्रांती’च्या पांढऱ्या टोप्या व ‘एक मराठा-लाख मराठा’ असे फलक होते. कुठलीही घोषणा न देता शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा निघाला. स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनपूर्वक गर्दी नियंत्रित केली. पोलिसांना काहीही हस्तक्षेप करावा लागला नाही. मोर्चात ज्येष्ठांसह, महिला व तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. मोर्चेकऱ्यांच्या वतीने किरण गव्हाणे, लोकिता साठे, सायली चितळे, सिद्धी शिंदे, ऋषाली कोहोक, अनुराधा बेरड, ऐश्वर्या अजबे, माधवी काकडे या आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाच्या व्यासपीठावर संस्कृती वाघस्कर, आदिती दुसुंगे, राधा पवार, वैष्णवी मोकाने, विद्या कांडेकर, जयश्री कवडे, अश्विनी जगदाळे या मुलींनी आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, कोपर्डी अत्याचार, शेतकरी आत्महत्या या विषयांवर आक्रमक भाषणे करून मागण्या मांडल्या. भाषणांपूर्वी कोपर्डीतील अत्याचारित मुलगी व उरी येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पावणेएक वाजता राष्ट्रगीताने मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर शहरातील गर्दी ओसरून महामार्ग सुरळीत होण्यासाठी तीन तास लागले. (प्रतिनिधी)>नेते वाडिया पार्कात बसूनमोर्चासाठी विरोधी पक्षनेते, माजी महसूलमंत्री, आजी-माजी मराठा आमदार सकाळी सात वाजताच शहरात दाखल झाले. मोर्चात महिला अग्रभागी, नंतर सामान्य माणसे व सर्वात शेवटी नेते असे धोरण ठरलेले होते. मात्र, गर्दीच एवढी होती की नेत्यांना वाडिया पार्क या क्रीडा संकुलातून बाहेरच पडणे शक्य झाले नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाचा सहभाग कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील, सरपंच तसेच ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. ते कोपर्डीहून मशाल घेऊन आले होते. ‘घटनेनंतर राज्यातील सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल आपण आभारी आहोत. अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी व्हावी अशी आपली मागणी आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपपत्र दाखल केलेले नाही, अशी खंत पीडित मुलीच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.>शहरात दिवसभरचारचाकी वाहनच नाही नगर शहर हे राज्याच्या मध्यवर्ती आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण, दौंड, बीड, शिर्डी अशा सर्व बाजूने येणारी वाहतूक मोर्चामुळे बाह्यवळण रस्त्यांनी वळविण्यात आली होती. त्यामुळे पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत अशी सुमारे दहा तास एकही एसटी अथवा मालमोटार शहरातून धावू शकली नाही. तीनही बसस्थानकांवर अक्षरश: शुकशुकाट होता. असे शहराच्या इतिहासात प्रथमच घडले.