शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बेळगावात मराठा महासागर

By admin | Updated: February 17, 2017 01:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सकल मराठा, मराठी क्रांती मूक मोर्चाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बिलगोजी ---बेळगाव --न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरूवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातून मराठा व मराठी बोलणाऱ्यांचा महासागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालून परवानगी देऊन सुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी निर्भीडपणे सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला. सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काहीवेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरू होणाऱ्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, परुष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, ‘एक मराठा लाख मराठा’ ‘मी मराठा’ असा उल्लेख असलेली डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते, तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. सकाळी नऊ वाजता शिवाजी उद्यानाचा (पान ४ वर)परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला.या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करुन प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असताना देखील विविध गल्ली-बोळांतून महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. नि:शब्द वातावरणात निघालेल्या या मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्त झाली. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी आसावरी पाटील, तृप्ती सडेकर, निकिता घुंगरेटकर, अस्मिता देशमुख, प्रांजल जुवेकर, भक्ती तेरसे, ऋतुजा पाटील, सलोनी पाटील या रणरागिणींचे भाषण झाले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांना रेश्मा उचगावकर, सोनल चौगले, नयना जगताप, नेत्रा उचगांवकर, पूजा उचगांवकर या रणरागिणींनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मोर्चा संपला, तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते. तब्बल चार तास मोर्चा चालला. मोर्चाचे संयोजक व अन्य बांधवांना भेटून जात होते. मोर्चा संपल्यानंतर तासभरातच संयोजक, स्वयंसेवकांनी मार्गाची स्वच्छता केली.मिरच्यांचा खाट तरीही शिस्तीचा थाटमोर्चाच्या प्रमुख मार्गावरील कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या अलीकडे मिरची मार्केट आहे. येथून मोर्चा जात असताना रस्त्यावर पडलेल्या मिरच्या मोर्चेकऱ्यांनी तुडविल्याने धूळ आणि मिरच्यांचा खाट येथे उठला. त्यामुळे येथील मोर्चेकऱ्यांना ठसका लागला, तर काहींनी भोवळ आली. अशा परिस्थितीतसुद्धा मोर्चा शिस्तपणे आणि शांततेत पुढे सरकत राहिला. क्षणचित्रे...मोर्चात शांतता, संयम, माणुसकी, एकतेचे दर्शनमहाराष्ट्र, गोवा राज्यांतील मराठा बांधवांचा सहभागरखरखत्या उन्हात तब्बल तीन तास चालला मोर्चामहिलांचा लक्षणीय सहभाग२ हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सात किलोमीटरच्या मोर्चेकऱ्यांच्या लांब रांगाअवघे शहर बनले भगवेमोर्चा संपताच तासभरात स्वयंसेवकांनी मोर्चाच्या मार्गाची स्वच्छता केली.सोशल मीडियावर मोर्चाचे क्षणाक्षणाला अपडेटस्नऊ ठिकाणी पथकांसह रुग्णवाहिका तैनात