शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

बेळगावात मराठा महासागर

By admin | Updated: February 17, 2017 01:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सकल मराठा, मराठी क्रांती मूक मोर्चाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बिलगोजी ---बेळगाव --न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरूवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातून मराठा व मराठी बोलणाऱ्यांचा महासागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालून परवानगी देऊन सुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी निर्भीडपणे सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला. सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काहीवेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरू होणाऱ्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, परुष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, ‘एक मराठा लाख मराठा’ ‘मी मराठा’ असा उल्लेख असलेली डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते, तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. सकाळी नऊ वाजता शिवाजी उद्यानाचा (पान ४ वर)परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला.या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करुन प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असताना देखील विविध गल्ली-बोळांतून महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. नि:शब्द वातावरणात निघालेल्या या मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्त झाली. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी आसावरी पाटील, तृप्ती सडेकर, निकिता घुंगरेटकर, अस्मिता देशमुख, प्रांजल जुवेकर, भक्ती तेरसे, ऋतुजा पाटील, सलोनी पाटील या रणरागिणींचे भाषण झाले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांना रेश्मा उचगावकर, सोनल चौगले, नयना जगताप, नेत्रा उचगांवकर, पूजा उचगांवकर या रणरागिणींनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मोर्चा संपला, तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते. तब्बल चार तास मोर्चा चालला. मोर्चाचे संयोजक व अन्य बांधवांना भेटून जात होते. मोर्चा संपल्यानंतर तासभरातच संयोजक, स्वयंसेवकांनी मार्गाची स्वच्छता केली.मिरच्यांचा खाट तरीही शिस्तीचा थाटमोर्चाच्या प्रमुख मार्गावरील कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या अलीकडे मिरची मार्केट आहे. येथून मोर्चा जात असताना रस्त्यावर पडलेल्या मिरच्या मोर्चेकऱ्यांनी तुडविल्याने धूळ आणि मिरच्यांचा खाट येथे उठला. त्यामुळे येथील मोर्चेकऱ्यांना ठसका लागला, तर काहींनी भोवळ आली. अशा परिस्थितीतसुद्धा मोर्चा शिस्तपणे आणि शांततेत पुढे सरकत राहिला. क्षणचित्रे...मोर्चात शांतता, संयम, माणुसकी, एकतेचे दर्शनमहाराष्ट्र, गोवा राज्यांतील मराठा बांधवांचा सहभागरखरखत्या उन्हात तब्बल तीन तास चालला मोर्चामहिलांचा लक्षणीय सहभाग२ हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सात किलोमीटरच्या मोर्चेकऱ्यांच्या लांब रांगाअवघे शहर बनले भगवेमोर्चा संपताच तासभरात स्वयंसेवकांनी मोर्चाच्या मार्गाची स्वच्छता केली.सोशल मीडियावर मोर्चाचे क्षणाक्षणाला अपडेटस्नऊ ठिकाणी पथकांसह रुग्णवाहिका तैनात