शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात मराठा महासागर

By admin | Updated: February 17, 2017 01:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सकल मराठा, मराठी क्रांती मूक मोर्चाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बिलगोजी ---बेळगाव --न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरूवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातून मराठा व मराठी बोलणाऱ्यांचा महासागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालून परवानगी देऊन सुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी निर्भीडपणे सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला. सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काहीवेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरू होणाऱ्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, परुष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, ‘एक मराठा लाख मराठा’ ‘मी मराठा’ असा उल्लेख असलेली डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते, तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. सकाळी नऊ वाजता शिवाजी उद्यानाचा (पान ४ वर)परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला.या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करुन प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असताना देखील विविध गल्ली-बोळांतून महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. नि:शब्द वातावरणात निघालेल्या या मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्त झाली. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी आसावरी पाटील, तृप्ती सडेकर, निकिता घुंगरेटकर, अस्मिता देशमुख, प्रांजल जुवेकर, भक्ती तेरसे, ऋतुजा पाटील, सलोनी पाटील या रणरागिणींचे भाषण झाले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांना रेश्मा उचगावकर, सोनल चौगले, नयना जगताप, नेत्रा उचगांवकर, पूजा उचगांवकर या रणरागिणींनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मोर्चा संपला, तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते. तब्बल चार तास मोर्चा चालला. मोर्चाचे संयोजक व अन्य बांधवांना भेटून जात होते. मोर्चा संपल्यानंतर तासभरातच संयोजक, स्वयंसेवकांनी मार्गाची स्वच्छता केली.मिरच्यांचा खाट तरीही शिस्तीचा थाटमोर्चाच्या प्रमुख मार्गावरील कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या अलीकडे मिरची मार्केट आहे. येथून मोर्चा जात असताना रस्त्यावर पडलेल्या मिरच्या मोर्चेकऱ्यांनी तुडविल्याने धूळ आणि मिरच्यांचा खाट येथे उठला. त्यामुळे येथील मोर्चेकऱ्यांना ठसका लागला, तर काहींनी भोवळ आली. अशा परिस्थितीतसुद्धा मोर्चा शिस्तपणे आणि शांततेत पुढे सरकत राहिला. क्षणचित्रे...मोर्चात शांतता, संयम, माणुसकी, एकतेचे दर्शनमहाराष्ट्र, गोवा राज्यांतील मराठा बांधवांचा सहभागरखरखत्या उन्हात तब्बल तीन तास चालला मोर्चामहिलांचा लक्षणीय सहभाग२ हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सात किलोमीटरच्या मोर्चेकऱ्यांच्या लांब रांगाअवघे शहर बनले भगवेमोर्चा संपताच तासभरात स्वयंसेवकांनी मोर्चाच्या मार्गाची स्वच्छता केली.सोशल मीडियावर मोर्चाचे क्षणाक्षणाला अपडेटस्नऊ ठिकाणी पथकांसह रुग्णवाहिका तैनात