शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

मुंबईत मराठा मूक मोर्चा : निर्णय १५ जानेवारीला

By admin | Updated: January 10, 2017 05:03 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

 मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे. काही जिल्ह्यांतील समन्वयकांनी ३१ जानेवारी या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे; तर काही प्रतिनिधींकडून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.याआधी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांनी ३१ जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. पण बैठकीत नियोजनाऐवजी ३१ जानेवारीच्या तारखेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मुंबईसह रायगड, नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यातील काही समन्वयकांनी या तारखेसंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. शिवाय १५ जानेवारीला बैठक घेऊन त्यातच अंतिम निर्णय घेण्याचे मान्य केले. औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी ३१ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. त्यापाठोपाठ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही मोर्चा निघणारच असा एल्गार केला आहे. (प्रतिनिधी)बैठकीतील निर्णय मान्य!३१ जानेवारीला मोर्चा काढण्यास विरोध नाही. मात्र मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांत असलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा सारासार विचार व्हायला हवा. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णय मान्य केला जाईल. तोपर्यंत समाजाने कोणत्याही घोषणेवर विश्वास ठेवू नये.- वीरेंद्र पवार (समन्वयक, मराठा क्रांती मूक बाइक रॅली - मुंबई)सुपारी घेतल्यासारखे वागू नये!मुंबईतील महामोर्चा हे मराठा समाजाचे ब्रह्मास्त्र आहे. आचारसंहितेमध्ये सरकारचे हात बांधलेले असताना कुणाच्या तरी अट्टाहासासाठी ते वाया घालविण्यात काहीही अर्थ नाही. मुळात निवडणुकांच्या काळात राजकीय उमेदवारांना मोर्चात सामील होता येणार नाही.त्यामुळे केवळ सुपारी घेतल्यासारखे कोणत्याही समन्वयकाने वागू नये. - विनोद पोखरकर (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - नवी मुंबई)अपयशी झाल्यास काय करणार?आचारसंहितांमूळे निवडणुकांच्या कामात मराठा समाजाचे उमेदवार अडकून मोर्चा अपयशी झाल्यास काय करणार? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे सर्व जिल्हा प्रतिनिधींनी मिळून १५ जानेवारीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा.- विनोद साबळे (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - रायगड)समन्वयात नाही, तर तारखेवरून गोंधळ!मोर्चा निघू नये, म्हणून सरकारचा कोणताही दबाव नाही. केवळ ३१ जानेवारीलाच मोर्चा काढायचा की पुढे ढकलायचा याबाबत गोंधळ आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तो स्पष्ट होईल.- वैभव जाधव (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - पालघर)