शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मुंबईत मराठा मूक मोर्चा : निर्णय १५ जानेवारीला

By admin | Updated: January 10, 2017 05:03 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

 मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे. काही जिल्ह्यांतील समन्वयकांनी ३१ जानेवारी या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे; तर काही प्रतिनिधींकडून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.याआधी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांनी ३१ जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. पण बैठकीत नियोजनाऐवजी ३१ जानेवारीच्या तारखेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मुंबईसह रायगड, नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यातील काही समन्वयकांनी या तारखेसंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. शिवाय १५ जानेवारीला बैठक घेऊन त्यातच अंतिम निर्णय घेण्याचे मान्य केले. औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी ३१ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. त्यापाठोपाठ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही मोर्चा निघणारच असा एल्गार केला आहे. (प्रतिनिधी)बैठकीतील निर्णय मान्य!३१ जानेवारीला मोर्चा काढण्यास विरोध नाही. मात्र मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांत असलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा सारासार विचार व्हायला हवा. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णय मान्य केला जाईल. तोपर्यंत समाजाने कोणत्याही घोषणेवर विश्वास ठेवू नये.- वीरेंद्र पवार (समन्वयक, मराठा क्रांती मूक बाइक रॅली - मुंबई)सुपारी घेतल्यासारखे वागू नये!मुंबईतील महामोर्चा हे मराठा समाजाचे ब्रह्मास्त्र आहे. आचारसंहितेमध्ये सरकारचे हात बांधलेले असताना कुणाच्या तरी अट्टाहासासाठी ते वाया घालविण्यात काहीही अर्थ नाही. मुळात निवडणुकांच्या काळात राजकीय उमेदवारांना मोर्चात सामील होता येणार नाही.त्यामुळे केवळ सुपारी घेतल्यासारखे कोणत्याही समन्वयकाने वागू नये. - विनोद पोखरकर (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - नवी मुंबई)अपयशी झाल्यास काय करणार?आचारसंहितांमूळे निवडणुकांच्या कामात मराठा समाजाचे उमेदवार अडकून मोर्चा अपयशी झाल्यास काय करणार? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे सर्व जिल्हा प्रतिनिधींनी मिळून १५ जानेवारीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा.- विनोद साबळे (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - रायगड)समन्वयात नाही, तर तारखेवरून गोंधळ!मोर्चा निघू नये, म्हणून सरकारचा कोणताही दबाव नाही. केवळ ३१ जानेवारीलाच मोर्चा काढायचा की पुढे ढकलायचा याबाबत गोंधळ आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तो स्पष्ट होईल.- वैभव जाधव (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - पालघर)