शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मराठा क्रांती मोर्चा : व्यथा मांडण्यासाठी माता-भगिनी मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:32 IST

मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाऱ्या हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली.

सागर नेवरेकर मुंबई : मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाºया हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली. राज्यभरातून मुंबईत आलेल्या महिलांनी ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा दिला.आझाद मैदानात पहाटेपासून मोर्चेकºयांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. विशेषत: कोल्हापूर, बीड, सांगली, सातारा जिल्ह्यातून आपल्या कुटुंबीयांसोबतच मोर्चात सामील होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. भायखळा परिसरातून निघालेल्या मोर्चातही महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल करीत स्वयंसेवकांचीही भूमिका पार पाडली.काही महिलांनी लहानग्यांना कमरेवर घेऊन आझाद मैदान गाठले. चिपळूण येथील रेणुका राजेशिर्के यांना गुडघ्याचा त्रास असूनही त्या पुढच्या पिढीसाठी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता भावी पिढीसाठी पुढाकार घेऊन मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे ठरविले. त्यामुळे चिपळूणमध्येही महिलांना मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.चिमुरडीच्या घोषणेवर टाळ्यांचा कडकडाटपालघर जिल्ह्यातील बोईसर येथून आलेल्या ईशान्वी देशमुख या तीन वर्षांच्या चिमुरडीने मोर्चाच्या सुरुवातीलाच आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण केला. अफलातून भाषण कौशल्य असलेल्या या आंदोलकाने, ‘मराठा समाजाला आरक्षण द्या’, ‘महिलांंवर अन्याय होऊ देऊ नका’, ‘आमचे संरक्षण करा’ या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले. ‘तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!’ या तिच्या घोषणेवर तर टाळ्यांचा कडकडाट झाला.कोपर्डीतील ग्रामस्थही सहभागीअहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थही मोर्चात सहभागी झाले होते. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी सारा गाव धावून गेला. ज्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत केली पोलिसांनी त्यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले व दोन महिने तुरुंगात डांबून ठेवले, असे कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक यांनी सांगितले. ते म्हणाले, चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला सोडून दिले. आम्ही दोन महिने कारागृहात खितपत पडलो त्याचे काय? अशी विचारणा संतप्त ग्रामस्थांनी केली. मराठा समाजाची ही अवहेलना आम्ही अजून किती दिवस खपवून घेणार, असा सवाल त्यांनी केला.