शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

मराठा क्रांती मोर्चाचा शेवट मुंबईत!, दिवाळीआधी धडकणार ‘एक मराठा लाख मराठा’!

By admin | Updated: September 20, 2016 23:11 IST

मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० : मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. या सर्व मोर्च्यांचा शेवट दिवाळीआधी मुंबईत होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईतील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी मंदीर नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

गेल्या महिन्याभरापासून राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघत आहेत. मुंबईतील मोर्चा हा सर्व मोर्चांचा परमोच्च बिंदू असेल, असे किशोर शितोळे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मोर्चाची तारिख यावेळी जाहीर करण्यात आली नसली, तरी महत्त्वाची बाब म्हणजे लवकरच मुंबईतील मोर्चाचे नियोजन करणारी कोअर कमिटी निवडण्यात येईल, असे सांगण्यात आले. या कोअर कमिटीद्वारे मुंबईत वॉर्डनिहाय शाखाप्रमुखांची निवड केली जाईल.

संबंधित शाखाप्रमुख त्या-त्या वॉर्डमध्ये मराठा आरक्षणाबाबत प्रचार व प्रसार करतील. राज्यभरात निघालेल्या सर्व जिल्ह्यांतील मोर्चातील कोअर कमिटींचे पदाधिकारी मुंबईतील मोर्चामध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील मोर्चा हा रेकॉर्डब्रेक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मराठा क्रांती मोर्चाची कोअर कमिटी जे संदेश सोशल मीडियावर पोस्ट करेल, त्यात कोणतीही छेडछाड न करता ते संदेश शेअर करण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे. कोअर कमिटी मोर्चाचा नकाशा तयार करून त्याची दिशा ठरवेल.

अवघ्या तीन तासांत मोर्चाची सांगता होणे अपेक्षित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी मोर्चाच्या नियोजनात तरूण आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सभागृहात उपस्थितांच्या मोबाईल क्रमांकांची नोंद घेण्यात आली असून पुढील बैठकांचे नियोजन त्यांना मेसेजद्वारे करण्यात येणार आहे.

तोपर्यंत मोर्चाचे विसर्जन नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मोर्चाची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. शिवाय मोर्चा नियोजित स्थळावर पोहचल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करून त्याठिकाणी पोहचण्याचे आवाहन निवेदनात केले जाईल. जोपर्यंत मुख्यमंत्री मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन आरक्षणाची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत मोर्चा विसर्जित करण्यात येणार नाही, असा सूचक इशारा संघटनेने दिला आहे.