शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३० मे रोजी मराठा क्रांती मोर्चा

By admin | Updated: May 20, 2017 02:21 IST

येत्या ३० मे रोजी मुंबईमध्ये सकल मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानापासून निघणारा हा महामोर्चा ‘मूक’ नसेल, असा इशाराही महामोर्चाच्या प्रतिनिधींनी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येत्या ३० मे रोजी मुंबईमध्ये सकल मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानापासून निघणारा हा महामोर्चा ‘मूक’ नसेल, असा इशाराही महामोर्चाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या महामोर्चानंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले.महामोर्चाचे प्रतिनिधी संभाजी पाटील यांनी सांगितले की, गेल्या १० महिन्यांपासून राज्यभर निघालेल्या मूक मोर्चांनंतरही सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच सरकारकडून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात प्रकरण असल्याचे सांगून सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. मुळात उच्च न्यायालय वारंवार सरकारला आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देताना दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाची बाजू मांडण्यात ढिम्मपणा दाखवणाऱ्या सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून केली आहे. ३० मेपूर्वी विशेष अधिवेशनाची घोषणा झाली नाही, तर मराठा समाज आझाद मैदानावरून लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.महामोर्चाचे संदीप जाधव म्हणाले की, याआधी निघालेल्या मोर्चांमध्ये स्वच्छतेपासून कायदा-सुव्यवस्था राखण्यापर्यंतची सर्व कामे समन्वयकांनी चोखपणे बजावली आहेत. मात्र या महामोर्चात सर्व जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने या शेवटच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करत आहोत. अन्यथा यापुढे कृतीतून मराठा समाज आपल्या मागण्या पूर्ण करून घेईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.- सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर बैलगाडी शर्यत आणि हायवेशेजारील बार सुरू करण्यासाठी सरकारने जी तत्परता दाखवली, ती मराठा आरक्षणाबाबत दिसत नाही. परिणामी, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राथमिकतेने सोडवण्यासाठी मराठा समाज आपले उपद्रव्य मूल्य, आक्रमकता दाखवणार आहे. म्हणूनच महामोर्चातील ‘मूक’ शब्द वगळल्याचे कदम यांनी सांगितले.