शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मराठा समाजाने केले शहर जाम; पोलिसांचा लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 18:24 IST

शहरातील आठ चौकांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 31 - शहरातील आठ चौकांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने अक्षरश: शहर जाम होते. या आंदोलनाला दोन ठिकाणी गालबोट लागले, तर काही चौकांमध्ये नागरिक, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होण्याच्या घटना घडल्या. तर वाळूज, हर्सूल सावंगी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आकाशवाणी चौकात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महानुभव आश्रम चौकात बसच्या काचा फोडण्यात आल्या. शहरात चक्काजाम होणार असल्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला तर काही बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवल्या. प्रत्येक चौकात समाजातील लहान-थोरांपर्यंत सर्व मंडळी समाजाच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरली. महिला व तरुण, तरुणींचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता. भगव्या ध्वजासह भजन, घोषणा, मागण्यांची फलके घेऊन प्रत्येक जण चौकाचौकात ठिय्या देत होता. समाज बांधवांनी प्रत्येक चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.जालना रोडवरील केंब्रिज शाळा चौक, हर्सूल टी पार्इंट, दौलताबाद टी पॉर्इंट, सावंगी नाका, महानुभव आश्रम चौक, सिडको बसस्थानक, आकाशवाणी चौक, लिंबेजळगाव फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलांनी पोलिसांच्या वाहनांना घेरून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त अतिमेशकुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सिडको बसस्थानक परिसरातील वसंतराव नाईक चौकात झालेल्या आंदोलनात एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, शिक्षणतज्ज्ञ मधुकरअण्णा मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव, किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुऱ्हेकर आदींसह हजारो समाजबांधव या चौकात घोषणाबाजी करीत होते. प्रत्येक चौकात गर्दी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ३१ जानेवारी २०१७ रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिल्यानंतर समाज पुन्हा शांततेत रस्त्यावर उतरला, परंतु काही ठिकाणी गालबोट लागण्यासारख्या घडल्या. ९ आॅगस्ट २०१६ रोजी समाजाने मराठा क्रांती मोर्चाची मुहूर्तमेढ या शहरात रोवल्यानंतर राज्यभर मराठा समाजाचे ३० मोर्चे निघाले. शांतता आणि शिस्त व स्वच्छता यामुळे मोर्चांची ऐतिहासिक नोंद झाली.