शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मराठा समाजाने केले शहर जाम; पोलिसांचा लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 18:24 IST

शहरातील आठ चौकांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 31 - शहरातील आठ चौकांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने अक्षरश: शहर जाम होते. या आंदोलनाला दोन ठिकाणी गालबोट लागले, तर काही चौकांमध्ये नागरिक, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होण्याच्या घटना घडल्या. तर वाळूज, हर्सूल सावंगी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आकाशवाणी चौकात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महानुभव आश्रम चौकात बसच्या काचा फोडण्यात आल्या. शहरात चक्काजाम होणार असल्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला तर काही बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवल्या. प्रत्येक चौकात समाजातील लहान-थोरांपर्यंत सर्व मंडळी समाजाच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरली. महिला व तरुण, तरुणींचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता. भगव्या ध्वजासह भजन, घोषणा, मागण्यांची फलके घेऊन प्रत्येक जण चौकाचौकात ठिय्या देत होता. समाज बांधवांनी प्रत्येक चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.जालना रोडवरील केंब्रिज शाळा चौक, हर्सूल टी पार्इंट, दौलताबाद टी पॉर्इंट, सावंगी नाका, महानुभव आश्रम चौक, सिडको बसस्थानक, आकाशवाणी चौक, लिंबेजळगाव फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलांनी पोलिसांच्या वाहनांना घेरून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त अतिमेशकुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सिडको बसस्थानक परिसरातील वसंतराव नाईक चौकात झालेल्या आंदोलनात एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, शिक्षणतज्ज्ञ मधुकरअण्णा मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव, किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुऱ्हेकर आदींसह हजारो समाजबांधव या चौकात घोषणाबाजी करीत होते. प्रत्येक चौकात गर्दी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ३१ जानेवारी २०१७ रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिल्यानंतर समाज पुन्हा शांततेत रस्त्यावर उतरला, परंतु काही ठिकाणी गालबोट लागण्यासारख्या घडल्या. ९ आॅगस्ट २०१६ रोजी समाजाने मराठा क्रांती मोर्चाची मुहूर्तमेढ या शहरात रोवल्यानंतर राज्यभर मराठा समाजाचे ३० मोर्चे निघाले. शांतता आणि शिस्त व स्वच्छता यामुळे मोर्चांची ऐतिहासिक नोंद झाली.