शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठा समाजाचा हुंडाबंदी व सामुदायिक विवाहासाठी पुढाकार

By admin | Updated: April 24, 2017 03:51 IST

राज्यातील मराठा समाजातील हुंडा परंपरेला मूठमाती देत, मुलामुलींचे सामुदायिक विवाह जुळवण्यासाठी मराठा समाजाने चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील मराठा समाजातील हुंडा परंपरेला मूठमाती देत, मुलामुलींचे सामुदायिक विवाह जुळवण्यासाठी मराठा समाजाने चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मराठा हुंडाबंदी व सामुदायिक विवाह चळवळ सुरू करण्यात आली असून, ही चळवळ व्यापक करण्यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे.लातूरच्या शीतल व्यंकट वायाळ या तरुणीने आत्महत्या करताना लिहिलेल्या जळजळीत वास्तवामुळे मराठा समाज अस्वस्थ झाल्याचे चळवळीचे निमंत्रक संजीव भोर पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील म्हणाले की, शीतलने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलेल्या कारणांमुळे कोणतीही संवेदनशील व्यक्ती हुंड्याविरोधात कृती करण्यास भाग पडेल. मराठा समाजातील या बेदखल समस्येबाबत केवळ हळहळ करून चालणार नाही, तर त्यावर ठोस कृतीची गरज आहे. म्हणूनच पुन्हा कुठल्याही ‘शीतल’ला जीव द्यावा लागणार नाही, असे काम करण्यासाठी ही चळवळ उभारण्यात येत आहे.या चळवळीत राजकीय पक्षांसह संघटनेत किंवा स्वतंत्रपणे कार्य करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते, उद्योजक, नोकरदार, महिला, युवक-युवती अशा विविध स्तरातील समाजबांधवांना सामील करून घेतले जाईल. सर्वांच्या सहभागातून हुंडाबंदी आणि सामुदायिक विवाह या विषयांवर रचनात्मक कार्य करण्यासाठी चळवळ काम करेल. ही चळवळ कोणतीही संघटना, पक्ष किंवा राजकीय नेत्यांपासून स्वतंत्ररीत्या काम करील. याविषयी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रभावीपणे काम करणारी यंत्रणाच निर्माण करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)