शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:43 IST

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारही या शाळांकडे दुर्लक्ष करीत असून, धोरणात्मक निर्णय घेत नाही. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि पालकांना एकत्र आणण्यासाठी गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर शाळेत मराठी अभ्यास केंद्रातर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मालाड, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, सांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले, खार, वांद्रे, कांदिवली, दहिसर या विभागातील १५ मराठी शाळांतील अडीचशे पालक या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर, मराठी शाळांतील शिक्षक, शाळाचालक व भाषासंवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे कार्यकर्तेही बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी मराठी शाळांसमोरील विविध प्रश्नांवर उपस्थितांनी आपली मते मांडली.मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सांगितले की, राज्यात मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. अशा वेळी मराठी शाळांनी एकत्र येऊन आवाज निर्माण केला पाहिजे. मराठी शाळांचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळा आणि पालकांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवे. मराठी शाळांतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास, मराठी माध्यमाकडे लोकांचा कल वाढू शकतो, असे ते म्हणाले.अ. भि. गोरेगावकर शाळेत केल्या जात असलेल्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती शाळेचे संचालक गिरीश सामंत यांनी दिली, तसेच मराठी शाळांच्या सद्यस्थितीविषयी आपली मते मांडली. मराठी शाळेत शिकूनही इंग्रजीवर प्रभुत्व मिळविता येते. इतकेच नव्हे, तर उत्तम करिअरही घडविता येऊ शकते. सरकारकडून वेळोवेळी काढल्या जाणाºया अधिसूचना, निर्णय, यामुळे मराठी शाळांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.याशिवाय या वेळी पालक, शिक्षक व शाळाचालकांनीहीआपली मते मांडली. इंग्रजीऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला का घातले, याविषयी निवडक पालकांनी आपली भूमिका मांडली. मातृभाषेतून शिक्षण हे अधिक नैसर्गिक व सहज असल्याने, आपण पाल्याला मराठी माध्यमात घातले, असा सूर त्यातून उमटला. या वेळी सुबोध केंभावी यांनी स्मार्टफोनद्वारे कमीत कमी वेळात गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, याविषयी माहिती दिली.