शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

आदिवासींपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या

By admin | Updated: February 9, 2015 00:58 IST

आदिवासींना अशिक्षित, गरीब, मागास असे समजले जात असले तरी त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिक्षणानेच माणूस मोठा होत नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक

राणी बंग : ‘विदर्भ रत्न’,‘नागपूर रत्न’ पुरस्कार प्रदाननागपूर : आदिवासींना अशिक्षित, गरीब, मागास असे समजले जात असले तरी त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिक्षणानेच माणूस मोठा होत नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी येथे केले. आदिवासींसाठी जेवढं केले त्यापेक्षा त्यांनी कितीतरी अधिक मला दिलं,अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.रामकृष्ण पैकुजी समर्थ स्मारक समितीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात डॉ. राणी बंग बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे तर प्रमुख अतिथी म्हणून शेखर आदमने उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. राणी बंग (गडचिरोली), अरुण मोरघडे (नागपूर),रजिया सुलताना (अमरावती) यांना ‘विदर्भ रत्न’ तर डॉ. चंद्रकांत मेहर (नागपूर) यांना ‘नागपूर रत्न’ पुरस्कार डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, माणूस फक्त शिक्षणामुळे शिक्षित होतो हा समज चुकीचा आहे. दैनंदिन जीवनातही तो अनेक गोष्टी शिकतो. आदिवासी गरीब, अशिक्षित, अंधश्रद्धाळू आहेत. पण ते कधी भीक मागत नाही,चोरी करीत नाही. उलट आदिवासींमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला जात नाही. हुंडा पद्धती नाही, मुलींना विवाहासाठी मुलगा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. महिलांचे शोषण होत नाही. कोणी चोरी करीत नाही, त्यांच्यात शेजारधर्म प्रामुख्याने पाळला जातो. या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. रजिया सुलताना म्हणाल्या की,समाजात राजकारणापासून तर अर्थकारणापासून सर्वच बाबींवर चर्चा होते. मात्र सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लैगिंक शिक्षणावर कोणीच बोलत नाही. लैंगिक साक्षरता नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासकीय पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार अधिक मोलाचा वाटतो. यावेळी अरुण मोरघडे आणि डॉ.चंद्रकांत मेहर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल समर्थ यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन रश्मी मदनकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)