शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

उत्खननाचा ‘प्रसाद’ अनेकांनी चाखला

By admin | Updated: February 2, 2015 23:55 IST

कोट्यवधीचे नुकसान : जागा देवस्थानची, रॉयल्टी ‘महसूल’ कडे, दराचा तर पत्ताच नाही

इंदुमती गणेश- कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ६००० एकर जमिनीचा ताळमेळ लागत नसला तरी जी उपलब्ध आहे त्यातील उत्खननासाठी दिलेल्या जमिनींच्या रॉयल्टीचा ‘प्रसाद’ ही महसूल खात्यालाच मिळत आहे. याबाबत देवस्थान समिती आणि शासन  असा वाद सुरू आहे. मात्र, या वादात महसूल विभागाच्या कांही अधिकाऱ्यांनी व त्या-त्या काळातील समितीतील जबाबदार माणसांनी उत्खननाचा ‘प्रसाद’  चांगलाच चाखला आहे. देवस्थानला मात्र यातील दमडीही मिळालेला नाही. लेखापरिक्षक बी. एस. शेवाळे यांनी सन २००६-०७ साली केलेल्या शेवटच्या लेखापरीक्षणानुसार गेली वर्षानुवर्षे रॉयल्टीच्या उत्पन्नाची ऋप्रत्यक्ष वसुलीच झालेली नसल्याने संंस्थेचे आतापर्यंत चार ते पाच कोटींच्या रकमेचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. अजूनही हे प्रकरण ‘जैसे थे’ आहे. शासनाच्या विधि व न्याय खात्यानेदेखील समितीची फसवणूक होत असल्याचा अहवाल दिला आहे.  देवस्थान समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील मौजे उदगिरी व कासार्डे या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केले जाते. स्वाती मिनरल्स, पीएजी माईन्स, युनिव्हर्सल माईन्स, पद्मावती माईन्स अशा कंपन्यांसोबत उत्खननाचा करार करण्यात आला.  सन २००८ नंतर कासार्डे येथे पद्मावती मायनिंग या कंपनीला मुदतवाढ तसेच ए. व्ही. माईन्स या कंपनीशी करार करण्यात आले. मात्र, समितीनेच दिलेल्या माहितीनुसार या कामात दरच ठरविण्यात आले नाहीत. उत्खननाची रॉयल्टी सरकारसोबत देवस्थानला मिळणे अपेक्षित असतानाही ही सगळी रक्कम महसूल विभागाकडे भरली जाते. वार्षिक करारानुसार सदरच्या रकमा  वेळच्या वेळी तलाठ्यांकडून  भरल्या जाणे आवश्यक असताना  कासार्डे येथील सन १९८५ ते १९९५ या दहा वर्षांच्या कालावधीतील १०  लाख ५९ हजार ५६४ इतकी  रक्कम तलाठ्याने एकदम भरली. सन १९८५ पूर्वी उत्खनन केले जात होते का? असल्यास रॉयल्टीच्या रकमेचे काय, हे प्रश्न उपस्थित होतात. तसेच १९९५ ते २००५ या दहा वर्षांच्या कालावधीतील कोणत्याच नोंदी यापूर्वीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलेल्या अहवालात नाहीत; त्यामुळे या कालावधीत उत्खनन चालू होते की नाही, हे स्पष्ट होत नाही.रॉयल्टीची रक्कम समितीला मिळावी यासाठी आधी शासनाकडे दावा चालू होता, आता तो न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. आजतागायत ही रक्कम जवळपास चार ते पाच कोटींपर्यंत जाते. देवस्थानचे नुकसान टाळण्यासाठी या प्रकरणाचा निकाल लागणे किती निकडीचे आहे, याची नोंद घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. लेखापरीक्षणात स्वाती मिनरल्स, युनिव्हर्सल मायनिंग, पद्मावती मायनिंग या कंपन्यांनी रॉयल्टीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात भरणा केल्याचे समितीकडून सांगण्यात आले; पण त्याबाबतचा कोणताही तपशील, दस्तऐवज समितीकडे नाही. जे काही व्यवहार होतात, ते महसूल विभाग आणि संबंधित कंपन्यांत; त्यामुळे समितीकडे याची कोणतीच माहिती नाही असे नमूद करण्यात आले; त्यामुळे या रॉयल्टी प्रकरणात पाणी मुरतंय हे नक्की. भुईभाडे, शाळांची थकबाकी पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, आजरा, कागल, शाहूवाडी, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांमधील जागा जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वर्षाकाठी चारशे, सहाशे रुपयांनी देण्यात आल्या आहेत. ही रक्कमदेखील वर्षानुवर्षे वसूल झालेली नाही. समितीच्या वतीने भुईभाड्याचा २ वर्षे ११ महिन्यांचा करार केला जातो. प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे या जमिनी भाडेकरूंकडेच आहेत. नाममात्र असलेले भुईभाडेही वर्षानुवर्षे थकीत आहे. देवस्थानने केलेल्या खुलाशात वर्षाला ४५ हजार रुपये रक्कम भुईभाड्यातून येत असल्याचे सांगण्यात आले. हे ग्राह्य धरले तरी १७ हजार एकर जागेसाठी फक्त ४५ हजार रुपये भुईभाडे म्हणजे न पटणारी बाब आहे.