शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

कचऱ्यापासून खतनिर्मिती

By admin | Updated: July 15, 2017 01:31 IST

घनकचरा व्यवस्थापनासाठी इंदापूर नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : घनकचरा व्यवस्थापनासाठी इंदापूर नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे. तेथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत कचरा साठवण्याकरिता शहरवासीयांना डस्टबीन देण्यात येणार आहेत.या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले की, इंदापूर शहरात प्रत्येक दिवशी सरासरी आठ ते नऊ टन कचरा गोळा होतो. तो गोळा करणे व त्याचे विलगीकरण करण्याचा ठेका सहा -सात महिन्यांपूर्वी एका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. शहरातील सर्व्हे नंबर १९७ मध्ये हा कचरा जमा केला जात आहे. तेथेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे. याच जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तेथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.घराच्या पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण झाले तर घनकचरा व्यवस्थापन सोपे होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या सूचनेनुसार येत्या पंधरा दिवसांत नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना दोन वेगवेगवेगळ्या रंगाची डस्टबिन देण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्याधिकारी म्हणाले की, एकामध्ये सुका व एकात ओला कचरा साठवून नगरपरिषदेची घंटागाडी दाराशी आल्यानंतर तो कचरा त्या गाडीत द्यायचा आहे.शहरातील काही प्रभागांमध्ये नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आहेत. त्या जागा कचरा व्यवस्थापनासाठी वापरात आणण्याचे नियोजन आहे. स्थानिक नागरिकांनी कचऱ्याचे विलगीकरण करुन तो या जागेत जमा करावा. नगरपरिषदेनंतर त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्टेवाट लावेल. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारांनी वैद्यकीय कचऱ्याची त्यांच्या परीने विल्हेवाट लावावी. तो नेण्यास नगर परिषद बांधील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे यांनी वेळोवेळी निदर्शने करून शासनाकडे दाद मागितली आहे. मात्र, तेथे सभोवती संरक्षक भिंत उभारुन नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्र उभारले आहे. सन २०१४ मध्ये इंदापूर नगर परिषदेने १७ लाख रुपये खर्चून सरडेवाडीजवळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी जमीन घेतली होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक असणारी परवानगी नगर परिषदेने घेतली नाही. त्यानंतर सॅटेलाइट सर्वेक्षण झाले. त्या वेळी तेथे मनुष्यवस्ती असल्याचे आढळल्याने शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ती जमीन दिली नाही. झोपड्यांमुळे त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारता आला नाही.