शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दारू गाळणाऱ्या हाताने ‘फिनाइल’ निर्मिती

By admin | Updated: July 31, 2016 03:59 IST

महिलांना पोलीस विभागाने नवजीवन योजनेंर्गत प्रशिक्षण देत फिनाईल उत्पादकाच्या रूपाने समाजासमोर आणले आहे.

रूपेश खैरी,

वर्धा- गावठी दारू गाळणाऱ्या पारधी समाजातील महिलांना पोलीस विभागाने नवजीवन योजनेंर्गत प्रशिक्षण देत फिनाईल उत्पादकाच्या रूपाने समाजासमोर आणले आहे. चोऱ्या करणारा समाज म्हणून शिक्का असलेल्या पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. त्यातूनच ‘नवजीवन योजना’ अंमलात आणली. एक पुरूष व १५ महिलांचा एक बचत गट तयार करण्यात आला. त्याला दुर्गा बचत गट असे नाव देण्यात आले. त्यांना येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. आता हे बचत गट स्वतंत्रपणे फिनाईलची निमिर्ती करत आहेत. रुग्णालयांसह विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत या बचत गटांचे फिनाईल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दारू गाळणाऱ्या हातांना पोलीस विभागाने प्रतिष्ठित व्यवसायी बनविल्याने वायफड पारधी बेड्यावरील गुन्ह्यांना बऱ्यापैकी आळा बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. >प्रत्येकी पाच हजारांची मदत फिनाईल बनविण्याच्या प्रशिक्षणानंतर महिलांना व्यवसाय उभारणीकरिता पोलीस विभागाने प्रती सदस्य पाच हजार अशी एकूण ८० हजार रुपयांची मदत केली. यातून प्रारंभी ४० हजार लिटर फिनाईलचे उत्पादन झाले. पोलिसांनीच केले फिनाइलचे मार्केटिंग या महिलांनी निर्माण केलेल्या फिनाईलच्या मार्केटींगकरिता पोलिसांनी प्रयत्न केले, ते अजूनही सुरूच आहेत. गुन्ह्याच्या विळख्यात असलेल्या या महिलांना समाजात स्थान मिळवून देण्याकरिता पोलीस विभागाचा लढा कायम आहे. >इतर महिलांच्या विरोधाने सूत कताई प्रकल्प रखडला देवळी तालुक्यातील वायफड पारधी बेड्यावरील महिलांनी प्रशिक्षणाअंती बदलविलेल्या मार्गामुळे पोलिसांचीही इच्छा बळावली. पोलिसांनी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावरील महिलांना सूत कताईचे प्रशिक्षण दिले; मात्र या महिलांना त्यांच्या बेड्यावरील इतर महिलांकडून झालेल्या विरोधामुळे त्यांनी माघार घेतल्याने येथे पोलिसांना अपयश आले. >आता दारू गाळण्याच्या मार्गावर परतायचे नाही दारू गाळून त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा मिळत होता. मात्र पोलिसांच्या कारवाईचा धाक होताच. पोलिसांनीच दाखविलेल्या व्यवसायामुळे बरे वाटत आहे. डोक्यामागे कोणताही ताप नाही. मुलेही शाळेत जाऊ लागली आहेत. त्यांना पुन्हा गुन्ह्याच्या विळख्यात टाकायचे नाही. व्यवसाय वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.यात यश येईलच. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा दारू गाळण्याच्या व्यवसायत परतायचे नाही, अशा प्रतिक्रिया दुर्गा बचत गटाच्या अध्यक्ष नीता संदीप भोसले व सचिव अक्षिता गजानन चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.>पारधी समाजातील महिला आज बचत गटांच्या माध्यमातून फिनाईल निर्मितीचे उत्तम काम करीत आहेत. महिला या व्यवसायात येताच वायफड पारधी बेड्यावरील कारवाईतही घट झाली आहे. - अंकीत गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा