शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

मनोहर पर्रीकर म्हणतात, 'हवे तर तुम्हीही घ्या श्रेय'

By admin | Updated: October 12, 2016 16:42 IST

जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सत्ताधारी भाजपा राजकारण करत आहे, असे आरोप करणा-या विरोधकांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी खोचक टोला हाणला आहे.सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या श्रेयातील सर्वाधिक वाटा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचा आहे, असे वक्तव्य पर्रीकर यांनी केले आहे. मात्र, याचवेळी सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय देश आणि देशवासियांसोबत वाटण्यास माझी काहीही हरकर नाही, कारण ही कारवाई लष्कराने केली आहे, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही, त्यामुळे जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे. 
 
उरी हल्ल्याबाबत देशभरातून आक्रोश, संताप व्यक्त होत होता, यावेळी देशवासियांचा हा राग शांत करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक त्यावरचा उपाय होता, असेही पर्रीकर यांनी सांगितले. या कारवाईनंतर जनता समाधानी झाल्याचे दिसत असल्याची भावनादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. एकप्रकारे, सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करणा-या आणि भाजप याचे राजकारण करत आहे, असा आरोप करणा-यांना पर्रीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा सादर करण्याची मागणी केली होती. तर 'यूपीए सरकार सत्तेत असताना तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, मात्र पाकिस्तानसोबत वाढता संघर्ष टाळण्यासाठी याबाबतची माहिती जाहीर केली नाही', असा दावा काँग्रेस पक्षाने केला होता. उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, याच सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.