शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मनोहर पर्रीकर म्हणतात, 'हवे तर तुम्हीही घ्या श्रेय'

By admin | Updated: October 12, 2016 16:42 IST

जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सत्ताधारी भाजपा राजकारण करत आहे, असे आरोप करणा-या विरोधकांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी खोचक टोला हाणला आहे.सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या श्रेयातील सर्वाधिक वाटा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचा आहे, असे वक्तव्य पर्रीकर यांनी केले आहे. मात्र, याचवेळी सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय देश आणि देशवासियांसोबत वाटण्यास माझी काहीही हरकर नाही, कारण ही कारवाई लष्कराने केली आहे, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही, त्यामुळे जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला पर्रीकर यांनी विरोधकांनी हाणला आहे. 
 
उरी हल्ल्याबाबत देशभरातून आक्रोश, संताप व्यक्त होत होता, यावेळी देशवासियांचा हा राग शांत करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक त्यावरचा उपाय होता, असेही पर्रीकर यांनी सांगितले. या कारवाईनंतर जनता समाधानी झाल्याचे दिसत असल्याची भावनादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. एकप्रकारे, सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करणा-या आणि भाजप याचे राजकारण करत आहे, असा आरोप करणा-यांना पर्रीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा सादर करण्याची मागणी केली होती. तर 'यूपीए सरकार सत्तेत असताना तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, मात्र पाकिस्तानसोबत वाढता संघर्ष टाळण्यासाठी याबाबतची माहिती जाहीर केली नाही', असा दावा काँग्रेस पक्षाने केला होता. उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, याच सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.