शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

बेवारस मनोरुग्ण रेल्वेने येतात सांगलीत

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

दिशाहीन भटकणे : भूकबळीने मृत्यूचे प्रमाण वाढले, वर्षाकाठी ३0 बेवारस मृतदेह

सचिन लाड - सांगली -सांगली, मिरजेत गेल्या काही महिन्यात बेवारसांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. मृत झालेली बेवारस व्यक्ती कोण आहे? कोठून आली? याचा शोध लागत नाही. यामागचे प्राथमिक कारण पोलिसांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता, बेवारस व्यक्ती या मनोरुग्ण आहेत, वेडाच्या भरात दिशाहीन होऊन भटकत रेल्वेने सांगली, मिरजेत येत असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टीपासून ते वंचित राहत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे.डोक्यावर परिणाम झाल्याने घरातील व्यक्ती निघून गेल्याच्या अनेक तक्रारी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. या व्यक्ती जातात कुठे? असा प्रश्न पडतो. वेडाच्या भरात त्यांची भटकंती होत राहते. रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांकडून काही तरी खायला मिळेल, असा विचार करुन ते तिथे जातात. मात्र स्टेशनवरुन त्यांना हाकलून लावले जाते. अनेकदा ते दिसेल त्या रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेत तिकीट तपासणीसाठी यंत्रणा सक्षम नसल्याने या मनोरुग्णांना पकडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. रेल्वे जिथे थांबेल, तिथे ते उतरतात. अशाप्रकारे सांगली, मिरज रेल्वे स्टेशनवरुन अनेक मनोरुग्ण शहरात दाखल होत आहेत.कर्नाटकात फिरणाऱ्या मनोरुग्णांना पकडून त्यांना महाराष्ट्रात आणून सोडल्याचे बोलले जाते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वीचे जुने मनोरुग्ण गायब झाले आहेत. प्रत्येक चौकात चार-पाच दिवसाला वेगळाच मनोरुग्ण नजरेस पडतो. स्टेशन चौकातील फूटपाथवर तर मनोरुग्णांची रांग लागलेली आहे. रात्रीच्यावेळी ते थंडीत कुडकुडत बसलेले असतात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टींपासून वंचित राहत आहेत. पोटाला अन्नच मिळत नसल्याने भूक व स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याचे शवविच्छेदन तपासणीत स्पष्ट होत आहे. शेवटपर्यंत बेवारसचबेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलीसच त्याचे नातेवाईक बनतात. ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र त्यांना यश येत नाही. प्रत्येकवर्षी पन्नासहून अधिक बेवारस मृतदेह सापडत आहेत. एक-दोन अपवाद वगळले, इतर मृतदेह बेवारसच राहिले आहेत. गेल्या महिन्याभरात दहा ते बारा बेवारस मृतदेह सापडले. यातील अनेकजण मनोरुग्ण असावेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.रकमेची अखेर तजवीज बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांना पाचशे रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घेतला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याच्या गाडीचा उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.