शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मनोरुग्ण रेल्वेने येतात सांगलीत

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

दिशाहीन भटकणे : भूकबळीने मृत्यूचे प्रमाण वाढले, वर्षाकाठी ३0 बेवारस मृतदेह

सचिन लाड - सांगली -सांगली, मिरजेत गेल्या काही महिन्यात बेवारसांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. मृत झालेली बेवारस व्यक्ती कोण आहे? कोठून आली? याचा शोध लागत नाही. यामागचे प्राथमिक कारण पोलिसांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता, बेवारस व्यक्ती या मनोरुग्ण आहेत, वेडाच्या भरात दिशाहीन होऊन भटकत रेल्वेने सांगली, मिरजेत येत असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टीपासून ते वंचित राहत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे.डोक्यावर परिणाम झाल्याने घरातील व्यक्ती निघून गेल्याच्या अनेक तक्रारी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. या व्यक्ती जातात कुठे? असा प्रश्न पडतो. वेडाच्या भरात त्यांची भटकंती होत राहते. रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांकडून काही तरी खायला मिळेल, असा विचार करुन ते तिथे जातात. मात्र स्टेशनवरुन त्यांना हाकलून लावले जाते. अनेकदा ते दिसेल त्या रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेत तिकीट तपासणीसाठी यंत्रणा सक्षम नसल्याने या मनोरुग्णांना पकडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. रेल्वे जिथे थांबेल, तिथे ते उतरतात. अशाप्रकारे सांगली, मिरज रेल्वे स्टेशनवरुन अनेक मनोरुग्ण शहरात दाखल होत आहेत.कर्नाटकात फिरणाऱ्या मनोरुग्णांना पकडून त्यांना महाराष्ट्रात आणून सोडल्याचे बोलले जाते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वीचे जुने मनोरुग्ण गायब झाले आहेत. प्रत्येक चौकात चार-पाच दिवसाला वेगळाच मनोरुग्ण नजरेस पडतो. स्टेशन चौकातील फूटपाथवर तर मनोरुग्णांची रांग लागलेली आहे. रात्रीच्यावेळी ते थंडीत कुडकुडत बसलेले असतात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टींपासून वंचित राहत आहेत. पोटाला अन्नच मिळत नसल्याने भूक व स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याचे शवविच्छेदन तपासणीत स्पष्ट होत आहे. शेवटपर्यंत बेवारसचबेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलीसच त्याचे नातेवाईक बनतात. ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र त्यांना यश येत नाही. प्रत्येकवर्षी पन्नासहून अधिक बेवारस मृतदेह सापडत आहेत. एक-दोन अपवाद वगळले, इतर मृतदेह बेवारसच राहिले आहेत. गेल्या महिन्याभरात दहा ते बारा बेवारस मृतदेह सापडले. यातील अनेकजण मनोरुग्ण असावेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.रकमेची अखेर तजवीज बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांना पाचशे रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घेतला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याच्या गाडीचा उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.