शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

माणिकराव ठाकरेंच्या भाषणातून अनेकांचा काढता पाय

By admin | Updated: June 17, 2016 22:37 IST

एकाग्र चित्ताने ऐकणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतला.

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. 17 - राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची भाषणे एकाग्र चित्ताने ऐकणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतला. काँग्रेसच्यावतीने दाभडी येथे आयोजित ह्यचाय की चर्चाह्ण कार्यक्रमात आयोजकांनी विनंती करूनही उपस्थित थांबण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ह्यचाय पे चर्चाह्ण या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दाभडी येथे गुरुवारी ह्यचाय की चर्चाह्ण हे प्रतिकात्मक आंदोलन केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार दिग्वीजयसिंग, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदरसिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, सिनेअभिनेते खासदार राज बब्बर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित होते.

या कार्यक्रमात खासदार दिग्वीजयसिंग, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राज बब्बर आदींची भाषणे उपस्थितांनी एकाग्रतेने ऐकली. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे भाषणाला उभे झाले. त्यावेळी उपस्थितात चुळबुळ सुरू झाली. काही मंडळी उठून जायला लागली. माणिकराव ठाकरेंचे भाषण सुरू होते, परंतु उपस्थित ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग यांनी ठाकरे यांचे भाषण थांबवून उपस्थितांना कार्यक्रम लवकरच समाप्त होणार आहे, असे म्हणत उपस्थितांना थांबण्याची विनंती केली.

काही लोक थांबलेही परंतु अनेकांनी सभामंडपातून काढता पाय घेतला. याबाबत काही उपस्थितांना विचारले असता माणिकराव ठाकरे आपल्याच जिल्ह्याचे आहे. प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. आता काय करतील, त्यांचे भाषण ऐकूनही काय फायदा असे सांगितले.