शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

आंबा-काजू उत्पादकांना मिळणार पॅकेजचा डोस

By admin | Updated: April 10, 2015 04:11 IST

अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे झालेले नुकसान आणि फळ प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मंत्री खडसे यांनी उत्तर दिले.नवीन किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकण्याआधीच आंबा गळू लागला आहे. यावर नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आंबा गुणवत्ता तपासणी केंद्र दापोलीऐवजी रत्नागिरीत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, काढणीपश्चात प्रशिक्षण केंद्राची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. फळ प्रक्रियेबाबत सदस्यांनी नवीन प्रकल्प आणावेत, नियमात बसत नसले तरी अशा प्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले. आंबा आणि काजू उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी कोकण दौरा करणास असल्याचे सांगतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल, असे खडसे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)