शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आंबा-काजू उत्पादकांना मिळणार पॅकेजचा डोस

By admin | Updated: April 10, 2015 04:11 IST

अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे झालेले नुकसान आणि फळ प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मंत्री खडसे यांनी उत्तर दिले.नवीन किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकण्याआधीच आंबा गळू लागला आहे. यावर नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आंबा गुणवत्ता तपासणी केंद्र दापोलीऐवजी रत्नागिरीत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, काढणीपश्चात प्रशिक्षण केंद्राची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. फळ प्रक्रियेबाबत सदस्यांनी नवीन प्रकल्प आणावेत, नियमात बसत नसले तरी अशा प्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले. आंबा आणि काजू उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी कोकण दौरा करणास असल्याचे सांगतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल, असे खडसे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)