शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापकाने मालकाला ८० लाख रुपयांना फसविले!

By admin | Updated: December 20, 2015 00:52 IST

स्त्रियांच्या अंतर्वस्त्रे उत्पादक कंपनीच्या गोदाम व्यवस्थापकाने, बँकेत कंपनीच्या नावाने बनावट खाती उघडून ८३ लाख रुपयांची फसवणूक केली. खाते उघडताना त्याने

- डिप्पी वांकाणी, मुंबईस्त्रियांच्या अंतर्वस्त्रे उत्पादक कंपनीच्या गोदाम व्यवस्थापकाने, बँकेत कंपनीच्या नावाने बनावट खाती उघडून ८३ लाख रुपयांची फसवणूक केली. खाते उघडताना त्याने आॅटोरिक्षा चालकाला कंपनीचा मालक दाखविले. ग्राहकाकडून धनादेश घेणे आणि त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम या व्यवस्थापकाकडे होते. त्याने ते धनादेश बनावट खात्यांमध्ये जमा केले व नंतर स्वत:च्या खात्यात ती रक्कम वळती करून घेतली. व्यवस्थापक आणि आॅटोरिक्षा चालकाला अटक झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उपरोक्त बँक खाते उघडताना ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) नियमांचे उल्लंघन झाल्याचा व अजूनही ती रक्कम ताब्यात घेण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचा आरोप कंपनीच्या मूळ मालकाने केला आहे. ८३ लाख रुपये गोदाम व्यवस्थापकाने वाहतूक व्यवसायात गुंतविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.सप्टेंबरमध्ये आम्ही आॅडिटरला हिशेबांची तपासणी करण्यास सांगितले होते. ग्राहकांनी मालाचे पैसे दिले होते, परंतु ते आमच्या खात्यात जमा झाल्याचे दिसत नव्हते, असे स्पष्ट झाले. त्यानंतर गोदाम व्यवस्थापक राकेश बन्सल याने खासगी बँकेच्या सांताक्रुझ आणि जोगेश्वरीतील शाखांमध्ये ते धनादेश जमा केल्याचे दिसले, असे श्रीनारायण अँड कंपनीचे भागीदार नारायण करवा यांनी सांगितले. ही कंपनी सिमेंट, कागद आणि अंतर्वस्त्र निर्मितीचा व्यापार करते.करवा म्हणाले की, ‘राकेश बन्सल हा गेल्या चार वर्षांपासून आमच्याकडे कामाला होता व ग्राहकाकडून धनादेश मिळाल्यानंतर त्यांना मालाचा पुरवठा करण्याचे काम त्याच्याकडे होते. स्टेट बँक आॅफ इंडियामधील आमच्या खात्यात त्याने ते धनादेश जमा करणे अपेक्षित होते, परंतु त्याने सांताक्रुझमधील खासगी बँकेत सप्टेंबर २०१४ मध्ये एक खाते उघडले. रिक्षाचालक अखिलेश राय हा श्रीनारायण कंपनीचा मालक असल्याचे राकेशने दाखविले. ही कंपनी स्वयंचलित वाहनांचा व्यवसाय करते व तिची उलाढाल ८० लाख आहे,’ असेही त्याने सांगितले. ‘बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने मुख्यालयाकडून हे खाते उघडण्यासाठी विशेष परवानगी घेतली आणि केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खातेदाराला ६० दिवसांची मुदत दिली. नियमांप्रमाणे केवायसी पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत असते. आमच्या ग्राहकांनी दिलेले ३८ लाख रुपयांचे धनादेश त्याने या बनावट खात्यात जमा करून, नंतर ती रक्कम त्याच्या वैयक्तिक खात्यात वळती करून घेतली,’ असेही करवा पुढे म्हणाले.दोन महिन्यांनंतर कांदिवलीतील बँकेच्या केवायसी कार्यालयाने शाखेला केवायसीची पूर्तता न झाल्यामुळे, बँकेसाठी ही जोखीम असून, ते खाते बंद करण्यात यावे, असे सांगितले. त्यानुसार खात्यातील शिल्लक रक्कम पे आॅर्डरने रिक्षाचालक राय याला देण्यात येऊन बँकेने खाते बंद केले. ३१ मार्च २०१५ रोजी बन्सल याच बँकेच्या जोगेश्वरीतील शाखेत गेला व त्याने वस्त्र निर्माता श्री नारायण कंपनीचा तो स्वत: मालक असल्याचे दाखविले. त्याला सेवाकर क्रमांकही मिळाला व त्याने २४ मार्च २०१५ रोजी कंपनी स्थापन झाल्याचे प्रमाणपत्र चार्टर्ड अकाउंटंटकडून मिळविले. या खात्यात त्याने ४५ लाख रुपयांचे धनादेश जमा केले, असे करवा यांनी सांगितले.करवा यांनी १२ आॅक्टोबरला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात बन्सल, राय आणि रजनी बिश्त यांच्याविरोधात तक्रार दिली. उपरोक्त पैशांतून बन्सलने रजनी बिश्तसाठी फ्लॅट घेतला. त्याने रजनी बिश्तच्या नावाने चालविल्या जात असलेल्या वाहतुकीच्या व्यवसायातही पैसे गुंतविले. ‘माझी तक्रार ही आहे की, पोलिसांनी एकदाही बन्सलची चौकशी केली नाही. बन्सलने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. तथापि, त्याने आपण आजारी असल्याचे न्यायालयात सांगितल्यानंतर, त्याला तेथून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. तिघेही तुरुंगात असताना मला मात्र माझे पैसे परत मिळालेले नाहीत,’ अशी व्यथा करवा यांनी मांडली. करवा म्हणाले की, ‘बन्सलने ५० लाख रुपये किमतीची उत्पादनेही आमच्या ग्राहकांना रोखीने विकल्याचे आम्हाला समजले आहे. अर्थातच, ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झालेली नाही.’