शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

सेना सत्तेवर येताच कुपोषण गायब

By admin | Updated: December 13, 2014 02:33 IST

आतार्पयत विरोधी बाकावर बसलेले असताना हे मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा दावा करणा:यांनी सत्तेत येताच विविध वैद्यकीय कारणास्तव हे मृत्यू झाल्याचा पवित्र घेतला आहे.

नागपूर: जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यात 22क् बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत. आतार्पयत विरोधी बाकावर बसलेले असताना हे मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा दावा करणा:यांनी सत्तेत येताच विविध वैद्यकीय कारणास्तव हे मृत्यू झाल्याचा पवित्र घेतला आहे.
विधान परिषदेत ठाणो जिल्ह्यातील बालमृत्यूंबाबत धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, जून ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 11 माता व 22क् नवजात बालकांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 7 मातामृत्यू व 234 नवजात बालकांचे मृत्यू झाले होते. मातामृत्यूमधील वाढ वैद्यकीय कारणास्तव झालेली आहे. गरोदर मातांची नोंदणी करून त्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणो व लोहयुक्त गोळ्य़ा देणो, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात प्रसुतीपूर्व, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात देण्यात येणा:या वैद्यकीय सुविधांची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. 
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात जुलै ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 18क् बालकांचे मृत्यू झालेले आहेत, अशी कबुली सुनील तटकरे, हेमंत  टकले आदींनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. त्यामध्ये कमी वजनामुळे 18, तापसदृश्य आजारामुळे 1क्, डायरियामुळे 5, न्युमोनियामुळे 28, कमी दिवसाच्या प्रसुतीमुळे 11, अॅसपेक्शियामुळे 23, सेप्टीसिमियामुळे 19, इतर आजारांमुळे 42 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार असताना ठाणो, मेळघाट येथील बालमृत्यू विविध आजारांमुळे होत असल्याचे शिवसेना मान्य करीत नव्हती. कुपोषण हीच मूळ समस्या असल्याचा दावा करीत होती. आता आरोग्य खाते शिवसेनेकडे आल्यावर मात्र कुठेही हे बालमृत्यू कुपोषणाने झाल्याचे मान्य केलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)