शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कुपोषित मुलांना पेस्ट पॅकेट नको!

By admin | Updated: June 9, 2017 02:14 IST

आदिवासी मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ‘ईझी नट पेस्ट पॅकेट’ हा खाऊ तीव्र कुपोषित मुलांना देण्याचा प्रस्ताव आणला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासी मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ‘ईझी नट पेस्ट पॅकेट’ हा खाऊ तीव्र कुपोषित मुलांना देण्याचा प्रस्ताव आणला आहे. मात्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या योजनेला आरोग्य अभियान व अन्न अधिकार अभियान या सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या योजनेमुळे पैशांची प्रचंड उधळपट्टी होणार आहेच, सोबतच या पेस्टचा कुपोषित मुलांना फारसा उपयोग होणार नसल्याचा आरोपही संघटनांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.विनोद शेंडे यांनी सांगितले की, आदिवासी भागातील ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना टीएचआर हा आहार पूरक पोषक आहार म्हणून दिला जातो. पोषण हक्क गटाने केलेल्या अभ्यासानुसार टीएचआर आहार खाण्याचे प्रमाण हे केवळ ५% आहे, उर्वरित ९५% टीएचआर हा एकतर फेकून दिला जातो, अथवा जनावरांना टाकला जातो. पाकिटातील आहाराचा हा अतिशय वाईट अनुभव असताना, याच धर्तीवर पुन्हा कुपोषित मुलांसाठी ‘पेस्ट पॅकेट’चा पर्याय सुचवण्याची गरजच काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.मुळात मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी गावपातळीवर ‘ग्राम बाल विकास केंद्र योजना’ राबवण्यात येत होती. या योजनेंतर्गत एक महिन्यासाठी कुपोषित मुलांना शिजवलेला ताजा आहार आणि उपचार दिले जात होते. या योजनेसाठी सरकारला केवळ १८ कोटी रुपये खर्च येत होता. यातून चांगल्या पद्धतीचे बदल दिसून येत असतानाही, तीन वर्षांपासून योजना बंद असल्याने कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. तरीही योजनेत गरम ताजा आहार दुय्यम करून, कंपनीमध्ये तयार केलेली पेस्ट देण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. यासाठी शासनाने २५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे. कोणताही सकारात्मक अनुभव, अभ्यास नसताना ही पाकिटे कुपोषित मुलांना देण्याचा प्रयत्न होत असल्याने या प्रकरणी भ्रष्टाचार होत असल्याचा संशय बळावतो, असा आरोप संघटनांनी केला आहे.>...अन्यथा आंदोलन!पेस्ट पाकिटांच्या माध्यमातून कुपोषण कमी झाल्याचा कोणताही प्रकाशित अभ्यास नाही. शासनाने लोकांशी, तज्ज्ञांशी कोणतीही चर्चा न करता आदिवासी मुलांवर पेस्ट पाकिटे थोपवली, तर गावोगावी ग्रामसभांद्वारे ‘पेस्ट पॅकेट चले जाव’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.