शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

‘मलिदा’ गेल्याच्या भावनेने आरोग्यमंत्र्यांविरुद्ध मोहीम!

By admin | Updated: May 14, 2017 05:21 IST

मंत्र्यांना काम जमत नसेल तर राजीनामे द्यावेत’, असे मेसेज टाकून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरोग्य विभागावर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण आणल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात वरिष्ठ पदांवर असलेल्या काही डॉक्टरांनी ‘मंत्र्यांना काम जमत नसेल तर राजीनामे द्यावेत’, असे मेसेज टाकून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत सरकारच्या निर्णयाविरुद्ध अधिकाऱ्यांचे असे चिखावणीखोर उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करून या मेजेस पाठविणाऱ्यांचे उगमस्थान शोधण्याचे निर्देशही दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य विभागात मुलभूत बदल करत संचालक, आरोग्य सेवा या नावाऐवजी आयुक्त, आरोग्य सेवा असे नामकरण केले. तसेच कुटुंबकल्याण व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या (एनआरएचएम) आयुक्तांना या विभागाचे प्रमुख केले गेले. त्यानंतर आरोग्य विभागाने आणखी एक आदेश काढला. त्यानुसार अर्थसंकल्प, प्रशासन, प्रशिक्षण, प्रचार, खरेदी आणि एमआयएस या विषयावरील सर्व प्रस्ताव सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालकांनी यापुढे थेट आयुक्तांना सादर करावेत. त्यांच्या मान्यतेनंतरच ते शासनाकडे सादर होतील असे ठरविले. आमचा विभाग तांत्रिकआहे, असे सांगत वर्षानुवर्षे सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागांनी त्यांच्याकडे आयएएस दर्जाचे अधिकारी नेमण्यास सतत विरोध केला होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही विभागांचा कथित विरोध मोडीत काढत या विभागांमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी नेमले. त्याच पद्धतीने आता आरोग्य विभागाचे प्रशासन आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली आणले गेले आहे.सूत्रांनुसार ज्यांना डॉक्टरकीच्या शैक्षणिक अर्हतेवर आरोग्य विभागात नोकरी दिली गेली व जे रुग्णसेवेचे काम सोडून वर्षानुवर्षे खरेदी आणि बदल्यांमध्येच अडकून राहिले अशा डॉक्टर असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपले अधिकार काढून घेत असल्याची भावना निर्माण झाल्यानेच त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात ‘पेटून उठा, ठणकावून सांगा’ अशी भाषा करणारे संदेश फिरवणे सुरु केले आहे. संचालक पदाला आता काही ‘आकर्षणच’ उरले नसल्याने या पदावर जाण्यात ‘अर्थ’ तरी काय? अशी भावना काहींमध्ये निर्माण झाल्याने हे संदेश फिरत असावेत अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यानी बोलून दाखवली.जिल्हा आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वर्षानुवर्षे भेटी दिल्या जात नाहीत, त्या ठिकाणी कोणते रुग्ण येतात, त्यांना काय हवे असते, कशा पध्दतीची आरोग्यसेवा लागते याचा कोणताही अभ्यास कधीही या विभागात झाल्याचे समोर आलेले नाही, त्यासाठी कधी या डॉक्टरांनी एकजूटीची भूमिका घेतली नाही. मात्र बदल्या आणि खरेदीचे अधिकार काढून घेऊन नेमके दुखऱ्या जागेवर बोट ठेवले गेल्यानेच, असे संदेश फिरवणे सुरु झाले आहे. आता त्या जागेवर उपचार करणेही सोपे जाईल असेही हा अधिकारी म्हणाला.>पदाचे गुपित उघडसंचालक आणि समकक्ष पदांवर असणारे एम. डी., एम. एस. अशी पदव्युत्तर पदवी असलेले डॉक्टर असतात. बाहेर खासगी व्यवसाय केला तर ते खोऱ्याने पैसा ओढू शकतात. असे असूनही असे उच्चशिक्षित डॉक्टर काही हजारांचा दरमहा पगार असलेल्या या पदांवर येण्यासाठी व टिकून राहण्यासाठी का धडपडत असतात, हे उघड गुपित आहे. रुग्णसेवा हे तर सर्वच डॉक्टरांचे कर्तव्य आहे. पण त्यासोबत कोट्यवधींच्या खरेदीचे अधिकार मिळतात हे खरे यामागचे इंगित आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.>असे मेसेज सोशल मीडियात मुद्दाम फिरवणे दुर्देवी आहे. हा विभाग खूप मोठा आहे, कामांना गती देणे, आरोग्यसेवा सामान्य पोहोचवणे हा केंद्रबिंदू ठेवून काम करणे हा आमचा हेतू आहे. कोणाच्या व्यक्तिगत भल्यासाठी आरोग्य विभाग कधीच काम करणार नाही. प्रशासनाने त्यांचे काम करावे आणि डॉक्टरांनी रुग्ण तपासणीचे काम करावे. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री