शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘माळीण’ गाव भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरण - काँग्रेस

By admin | Updated: June 29, 2017 01:21 IST

माळीण गाव पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल असून राज्यातील इतर गावांचेही याच धर्तीवर पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा करणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माळीण गाव पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल असून राज्यातील इतर गावांचेही याच धर्तीवर पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारचा भ्रष्ट आणि निष्काळजी कारभार पहिल्या पावसानेच उघडा पाडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या पुर्नवसित माळीण गावाची पहिल्याच पावसात वाताहात झाली आहे. त्यामुळे हे सरकार केवळ बोलघेवडे आणि असंवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव २०१४ साली अतिवृष्टीमुळे अक्षरश: गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५१ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने कोट्यवधींचा खर्च करुन गावाचे पुनर्वसन केले. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुनर्वसित गावाचा लोकार्पण सोहळाही पार पडला. यावेळी पुनर्वसित माळीण स्मार्ट ग्राव असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यांचा हा दावा पोकळ असल्याचे पावसाने सिद्ध केले आहे. पावसामुळे माळीण गावातील घरांच्या भिंती, पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर आदींना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा भितीचे वातावरण आहे. काम निकृष्ठ दर्जाचे आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या फडणवीस सरकारचे पायही मातीचेच आहेत, हे यातून सिद्ध झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.