शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया विभागाचा कारभार अकोलेकरांच्या मुळावर!

By admin | Updated: March 3, 2017 01:33 IST

डासांची पैदास वाढली; फवारणीला खो!

अकोला, दि.२ : शहरात डासांची पैदास वाढली असून त्यांच्या उच्छादामुळे अकोलेकर हैराण झाले आहेत. मनपाच्या अखत्यारित असलेल्या मलेरिया विभागाचा ढेपाळलेला कारभार अकोलेकरांच्या मुळावर उठला असून या विभागातील मस्तवाल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागील महिनाभरापासून साचलेली डबकी, निचरा न होणाऱ्या सांडपाण्यात डासांची पैदास वाढल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच डासांचा उपद्रव सुरू होतो. डासांची पैदास रोखण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या मलेरिया विभागाने कार्यरत राहण्याची गरज आहे; परंतु या विभागाचे कामकाज हवेत सुरू असल्याची परिस्थिती आहे. दक्षिण झोन अंतर्गत मनपाच्या इमारतीमध्ये मलेरिया विभागाचे कार्यालय केवळ नावापुरते थाटण्यात आले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रभागांमध्ये दररोज धुरळणी व फवारणी करणे अपेक्षित आहे. नगरसेवकांनी तक्रार केल्यास संबंधित कर्मचारी अवघ्या अर्धा तासात फवारणी करून कामावरून पळ काढत असल्याची माहिती आहे. या प्रकाराला खुद्द नगरसेवकही कंटाळले आहेत. मलेरिया विभागाकडे तक्रार केल्यास थातूर-मातूर फवारणी केली जाते. फवारणीसाठी लागणारे रसायन शासनामार्फत प्राप्त होत असताना मलेरिया विभागाकडून आखडता हात का घेतला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे. कर्तव्यातून पळ काढण्याच्या मानसिकतेमुळे मलेरिया विभागाचा कारभार पुरता ढेपाळला असून त्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. डासांची पैदास वाढल्याने लहान मुलांमध्ये विविध आजारांचा फैलाव होत आहे. विभागावर नियंत्रणच नाही!मलेरिया विभागाचे कामकाज सांभाळण्यासाठी शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनामार्फत मनपाकडे अनुदान जमा होते. वेतन अदा करण्यापलीकडे मलेरिया विभाग कोणती जबाबदारी पार पाडतो, यावर मनपा प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचेही मूल्यमापन होत नसल्याची परिस्थिती आहे.कर्मचाऱ्यांची झोननिहाय व्हावी नियुक्ती!डासांचा उच्छाद वाढल्यास नगरसेवकांकडून मलेरिया विभागाशी संपर्क साधला जातो. अवघ्या अर्ध्या-एक तासात संबंधित कर्मचारी फवारणी करून निघून जातो. सात तास हा कर्मचारी जातो कुठे, असा सवाल उपस्थित होतो. यासाठी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती करून त्यांच्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे अनिवार्य झाले आहे.