शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

By admin | Updated: July 14, 2017 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शांततेसह सहअस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि भारत हाच जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्व लष्करी उपाय योजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, असा ठराव आज पुण्यातील मुस्लिम समुदायाच्या संघटना, मौलवी, इमाम आणि मशिदीतील मुतवल्ली यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत संमत केलेला ठराव : पवित्र अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंवर झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अवामी महाज या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मौलाना निजामुद्दीन (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर), मौलाना अय्युब अश्रफी (अध्यक्ष, पुणे जिल्हा सुन्नी जमात), मुफ्ती अहमद हसन (आॅल इंडिया इमाम्स कौन्सिल), अनीस चिश्ती, (ज्येष्ठ अभ्यासक), डॉ. पी. ए. इनामदार (अध्यक्ष, अवामी महाज), एस.बी.एच. इनामदार, शेख चाँद सरदार, वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), लतीफ मगदूम (सचिव, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी), इक्बाल मुलाणी, शफी हसन काझमी, शेख शाहिद मुनीर, अब्दुल वहाब शेख हे मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे ही बैठक झाली. धार्मिक कट्टरतावादाचा निषेध आहेच; पण कोणीही त्याचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असे अनीस चिश्ती म्हणाले.>बैठकीत संमत केलेला ठराव भारताच्या सर्व सीमांवर शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्हा सर्व भारतीयांची चौफेर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होणार नाही याची जाणीव ठेवून आहोत. भारताच्या सीमा शांततामय न राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्कर, लष्करी सामग्री व इतर बाबींवर गेली सत्तर वर्षे प्रचंड प्रमाणात खर्च करत आहोत. सदर खर्च वाढत असल्याने अनेक प्रगतीच्या योजना अमलात आणू शकलो नाही.या करिता ब्रिटिशांनी पूर्वनियोजित कालानुसार भारताची फाळणी केली ही अनैसर्गिक होती व आहे, करिता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नम्र विनंती करत आहोत, की सर्व लष्करी उपाय योजून पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, जेणे करून स्वातंत्र्यापूर्वी व नंतर भारतीय नेत्यांनी जी स्वप्ने पाहलिी होती ती पूर्ण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे भारत जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल, असे घडल्यास भारतीय संस्कृतीचा शांततेचा सहअस्तित्वाचा संदेश कृतीसह जगात अमलात आणता येईल. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, पाकिस्तानची दहशतवादी कृत्ये यांचा सर्व वक्त्यांनी निषेध केला. सर्व धर्मांनी मानवता, सलोखा, शांततेचा संदेश दिला आहे. दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. बंधुभाव कायम राहिला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. पी. ए. इनामदार यांनी ठराव मांडला आणि उपस्थित सर्वांनी एकमताने तो मंजूर केला. शुक्रवारी पुण्यातील सर्व मशिदींमध्ये हा ठराव वाचून दाखवला जाणार आहे.