शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

By admin | Updated: July 14, 2017 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शांततेसह सहअस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि भारत हाच जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्व लष्करी उपाय योजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, असा ठराव आज पुण्यातील मुस्लिम समुदायाच्या संघटना, मौलवी, इमाम आणि मशिदीतील मुतवल्ली यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत संमत केलेला ठराव : पवित्र अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंवर झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अवामी महाज या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मौलाना निजामुद्दीन (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर), मौलाना अय्युब अश्रफी (अध्यक्ष, पुणे जिल्हा सुन्नी जमात), मुफ्ती अहमद हसन (आॅल इंडिया इमाम्स कौन्सिल), अनीस चिश्ती, (ज्येष्ठ अभ्यासक), डॉ. पी. ए. इनामदार (अध्यक्ष, अवामी महाज), एस.बी.एच. इनामदार, शेख चाँद सरदार, वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), लतीफ मगदूम (सचिव, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी), इक्बाल मुलाणी, शफी हसन काझमी, शेख शाहिद मुनीर, अब्दुल वहाब शेख हे मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे ही बैठक झाली. धार्मिक कट्टरतावादाचा निषेध आहेच; पण कोणीही त्याचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असे अनीस चिश्ती म्हणाले.>बैठकीत संमत केलेला ठराव भारताच्या सर्व सीमांवर शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्हा सर्व भारतीयांची चौफेर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होणार नाही याची जाणीव ठेवून आहोत. भारताच्या सीमा शांततामय न राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्कर, लष्करी सामग्री व इतर बाबींवर गेली सत्तर वर्षे प्रचंड प्रमाणात खर्च करत आहोत. सदर खर्च वाढत असल्याने अनेक प्रगतीच्या योजना अमलात आणू शकलो नाही.या करिता ब्रिटिशांनी पूर्वनियोजित कालानुसार भारताची फाळणी केली ही अनैसर्गिक होती व आहे, करिता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नम्र विनंती करत आहोत, की सर्व लष्करी उपाय योजून पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, जेणे करून स्वातंत्र्यापूर्वी व नंतर भारतीय नेत्यांनी जी स्वप्ने पाहलिी होती ती पूर्ण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे भारत जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल, असे घडल्यास भारतीय संस्कृतीचा शांततेचा सहअस्तित्वाचा संदेश कृतीसह जगात अमलात आणता येईल. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, पाकिस्तानची दहशतवादी कृत्ये यांचा सर्व वक्त्यांनी निषेध केला. सर्व धर्मांनी मानवता, सलोखा, शांततेचा संदेश दिला आहे. दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. बंधुभाव कायम राहिला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. पी. ए. इनामदार यांनी ठराव मांडला आणि उपस्थित सर्वांनी एकमताने तो मंजूर केला. शुक्रवारी पुण्यातील सर्व मशिदींमध्ये हा ठराव वाचून दाखवला जाणार आहे.