शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

सर्वेक्षण बस करा, आता विकास हवा!

By admin | Updated: January 19, 2017 03:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्याची घोषणा नुकतीच केली.

भार्इंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्याची घोषणा नुकतीच केली. त्याचे पडसाद मीरा-भार्इंदरमध्येही उमटले. शहराच्या विविध भागातील झोपड्यांचे पालिकेने काही वर्षापूर्वी राजीव आवास योजनेतंर्गत सर्र्वेक्षण केल्यानंतर नवीन योजनेच्या सर्वेक्षणाचे फॅड आले आहे. यामुळे सततच्या सर्वेक्षणाला कंटाळलेल्या झोपडपट्टीधारकांनी आता विकास हवा अशी मागणी केली आहे.शहरात सुमारे ५० हजार झोपड्या अस्तित्वात आहेत. त्यांना पालिकेने अद्याप मालमत्ता कराच्या कक्षेत आणले नसले तरी त्यांना पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात आहेत. पालिकेने २००९ मध्ये जनतानगर झोपडपट्टी व काशिचर्च येथील अनुक्रमे ३ हजार ६६५ व ४७१ अशा एकूण ४ हजार १३६ झोपडीपट्टीधारकांचा बीएसयूपी योजनेत समावेश केला. या योजनेतंर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी एका आठ मजली इमारतीतील सदनिका फेब्रुवारीमध्ये १७९ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. या अतंर्गत लाभार्थ्यांनाही १० टक्के रक्कम द्यायची आहे. आठ वर्षापासून रखडलेली ही योजना पुरेशा निधीअभावी रेंगाळण्याची चिन्हे आहेत. त्यावर पालिकेने व्यापारी वापरासाठी २५ टक्के जमिनीचा विकास करुन ती भाडेतत्वावर किंवा विक्रीचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. यातून मिळणारा निधी त्या योजनेच्या पूर्णत्वासाठी खर्ची घातला जाणार आहे. दरम्यान, उर्वरित झोपडीधारकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी पुर्वी राबविलेली राजीव आवास योजना काही महिन्यातच गुंडाळले. तत्पूर्वी पालिकेने १९९५ पूर्वीच्या झोपड्यांना फोटोपासचे वाटप केले आहे. सीआरझेडच्या नावाखाली घर दुरुस्ती ही नाकारली जाते आहे. अशातच राजीव आवास योजनेऐवजी केंद्राने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. (प्रतिनिधी)>कागदपत्रांसाठी झोपडीधारकांची धावपळ; नेत्यांची बॅनरबाजीनव्या योजनेच्या घोषणेचा पुरेपूर फायदा राजकीय मंडळींनी घेत झोपडपट्टी परिसरात बॅनरबाजी सुरु केली आहे. त्यात सर्वेक्षणासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसुद्धा सुरु आहे. राष्ट्रवादीने तर राजीव आवास योजनेतंर्गतच घरे मिळणार असल्याचा दावा केला असून भाजपाने मात्र केवळ प्रधानमंत्री आवास योजनेचा उदोउदो केला आहे. या नवीन सर्र्वेक्षणामुळे झोपडीधारक मात्र कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ करु लागला आहे.