शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

जीवनात आनंद टिकून ठेवण्यासाठी या 'पाच' गोष्टी नक्की करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 20:31 IST

आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे.

ऑनलाइन लोकमत, मुंबई, दि. 14 - आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे. आजूबाजूला घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपण चिंताक्रांत होतो. विनाकारण काळजी करत राहतो. त्याचाच परिणाम ब-याचदा आपल्या कामावर होतो. त्यामुळे स्वतःमध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते. त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टींचा अंगीकार करायला पाहिजे, याची माहिती पुढीलप्रमाणे-

1. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असा लगेच निष्कर्ष काढू नकाएखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, हे आपण त्या प्रसंगावरून लगेच ठरवून टाकतो आणि मग त्याच्यातच गुरफटून पडतो. त्यामुळे चांगला आणि वाईट हे शब्द मनात आणू नका. कोणतीही टोकाची भूमिका उचलण्याआधी एकदा विचार करा.

2. आयुष्यात परिवर्तन महत्त्वाचे आहेजगात कुठली गोष्ट वेळेनुरूप कायम येत असले ती म्हणजे परिवर्तन. तुम्ही जर दुःखात असाल, तर कालांतरानं दुःख दूर होईल आणि जीवनात पुन्हा आनंद येईल. त्यानुसारच आनंदावर काही काळापुरते दुःखाचं सावट असतंच. आयुष्यात परिवर्तन ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. परिवर्तित होणारच हे स्वीकारलं तर पुढे जाणे कठीण नाही.

3. कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास नकोआपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. हे खरं असलं तरी आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे. मात्र त्यातही समाधानी राहण्यास शिकल्यास आनंद टिकून राहील.

4. इतरांची बोलणी ऐकणं सहन कराआपण इतरांशी कसे वागावे, हे आपल्या हातात आहे. मात्र इतरांच्या वागणुकीवर आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही. संतापाच्या भरात एखादा आपल्याला अपशब्द बोलू शकतो, मात्र त्या वागणुकीचा मनस्ताप करून घेण्यापेक्षा समोरच्याला क्षमा करा आणि विसरून जा, हा मंत्र आयुष्यात जपलात तर आपल्याला होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.

5. भावनांतून शिकण्याला प्राधान्य द्याप्रत्येक भावनेचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे चांगल्या भावनांना आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे दुःख, निराशा यांचाही सन्मान करायला शिका. वाईट वाटण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक भावना एकदा जरूर अनुभवायला हवी. त्यातूनच तुम्ही शिकाल आणि कणखर व्हाल.