शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जीवनात आनंद टिकून ठेवण्यासाठी या 'पाच' गोष्टी नक्की करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 20:31 IST

आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे.

ऑनलाइन लोकमत, मुंबई, दि. 14 - आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे. आजूबाजूला घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपण चिंताक्रांत होतो. विनाकारण काळजी करत राहतो. त्याचाच परिणाम ब-याचदा आपल्या कामावर होतो. त्यामुळे स्वतःमध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते. त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टींचा अंगीकार करायला पाहिजे, याची माहिती पुढीलप्रमाणे-

1. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असा लगेच निष्कर्ष काढू नकाएखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, हे आपण त्या प्रसंगावरून लगेच ठरवून टाकतो आणि मग त्याच्यातच गुरफटून पडतो. त्यामुळे चांगला आणि वाईट हे शब्द मनात आणू नका. कोणतीही टोकाची भूमिका उचलण्याआधी एकदा विचार करा.

2. आयुष्यात परिवर्तन महत्त्वाचे आहेजगात कुठली गोष्ट वेळेनुरूप कायम येत असले ती म्हणजे परिवर्तन. तुम्ही जर दुःखात असाल, तर कालांतरानं दुःख दूर होईल आणि जीवनात पुन्हा आनंद येईल. त्यानुसारच आनंदावर काही काळापुरते दुःखाचं सावट असतंच. आयुष्यात परिवर्तन ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. परिवर्तित होणारच हे स्वीकारलं तर पुढे जाणे कठीण नाही.

3. कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास नकोआपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. हे खरं असलं तरी आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे. मात्र त्यातही समाधानी राहण्यास शिकल्यास आनंद टिकून राहील.

4. इतरांची बोलणी ऐकणं सहन कराआपण इतरांशी कसे वागावे, हे आपल्या हातात आहे. मात्र इतरांच्या वागणुकीवर आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही. संतापाच्या भरात एखादा आपल्याला अपशब्द बोलू शकतो, मात्र त्या वागणुकीचा मनस्ताप करून घेण्यापेक्षा समोरच्याला क्षमा करा आणि विसरून जा, हा मंत्र आयुष्यात जपलात तर आपल्याला होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.

5. भावनांतून शिकण्याला प्राधान्य द्याप्रत्येक भावनेचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे चांगल्या भावनांना आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे दुःख, निराशा यांचाही सन्मान करायला शिका. वाईट वाटण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक भावना एकदा जरूर अनुभवायला हवी. त्यातूनच तुम्ही शिकाल आणि कणखर व्हाल.