शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात आनंद टिकून ठेवण्यासाठी या 'पाच' गोष्टी नक्की करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 20:31 IST

आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे.

ऑनलाइन लोकमत, मुंबई, दि. 14 - आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे. आजूबाजूला घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपण चिंताक्रांत होतो. विनाकारण काळजी करत राहतो. त्याचाच परिणाम ब-याचदा आपल्या कामावर होतो. त्यामुळे स्वतःमध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते. त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टींचा अंगीकार करायला पाहिजे, याची माहिती पुढीलप्रमाणे-

1. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असा लगेच निष्कर्ष काढू नकाएखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, हे आपण त्या प्रसंगावरून लगेच ठरवून टाकतो आणि मग त्याच्यातच गुरफटून पडतो. त्यामुळे चांगला आणि वाईट हे शब्द मनात आणू नका. कोणतीही टोकाची भूमिका उचलण्याआधी एकदा विचार करा.

2. आयुष्यात परिवर्तन महत्त्वाचे आहेजगात कुठली गोष्ट वेळेनुरूप कायम येत असले ती म्हणजे परिवर्तन. तुम्ही जर दुःखात असाल, तर कालांतरानं दुःख दूर होईल आणि जीवनात पुन्हा आनंद येईल. त्यानुसारच आनंदावर काही काळापुरते दुःखाचं सावट असतंच. आयुष्यात परिवर्तन ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. परिवर्तित होणारच हे स्वीकारलं तर पुढे जाणे कठीण नाही.

3. कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास नकोआपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. हे खरं असलं तरी आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे. मात्र त्यातही समाधानी राहण्यास शिकल्यास आनंद टिकून राहील.

4. इतरांची बोलणी ऐकणं सहन कराआपण इतरांशी कसे वागावे, हे आपल्या हातात आहे. मात्र इतरांच्या वागणुकीवर आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही. संतापाच्या भरात एखादा आपल्याला अपशब्द बोलू शकतो, मात्र त्या वागणुकीचा मनस्ताप करून घेण्यापेक्षा समोरच्याला क्षमा करा आणि विसरून जा, हा मंत्र आयुष्यात जपलात तर आपल्याला होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.

5. भावनांतून शिकण्याला प्राधान्य द्याप्रत्येक भावनेचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे चांगल्या भावनांना आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे दुःख, निराशा यांचाही सन्मान करायला शिका. वाईट वाटण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक भावना एकदा जरूर अनुभवायला हवी. त्यातूनच तुम्ही शिकाल आणि कणखर व्हाल.