शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

ध्वनिक्षेपण मर्यादा २५ दिवस करा

By admin | Updated: March 1, 2017 04:47 IST

ध्वनीक्षेपणाची वेळ मर्यादा १५ दिवसांऐवजी २५ दिवस इतकी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

मुंबई : ध्वनीक्षेपणाची वेळ मर्यादा १५ दिवसांऐवजी २५ दिवस इतकी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. ध्वनिक्षेपणासाठी सध्या केंद्राच्या कायद्यानुसार रात्री १० पर्यंतची मर्यादा असते. त्यातून केवळ १५ दिवसांची सूट देण्यात आली असून या १५ दिवसांत रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपण करता येतात. ही सूट २५ दिवसांकरता असावी, अशी मागणी राज्याने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या नवी दिल्लीतील बैठकीत मंगळवारी या संदर्भात चर्चा झाली. जुलैपूर्वी या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दवे यांनी दिले.झुडपी जंगलांची कटकट संपणारविदर्भातील सहा जिल्ह्णांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या झुडपी जंगलांचा प्रश्न सोडविला जाईल आणि त्यातील ४० हजार हेक्टर जमीन ही महसुली असल्याचे प्रमाणित केले जाईल, असे आश्वासन अनिल दवे यांनी यावेळी दिले. विदभार्तील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सहा जिल्ह्णांत झुडपी जंगलांचा प्रश्न आहे. तेथे प्रत्यक्षात वन नाहीच पण कागदोपत्री तसा उल्लेख केल्याने विकास कामे हाती घेता येत नाहीत. झुडपी जंगलाची ही नोंद बदलण्यात यावी. झुडपी जंगल जमीनचा पट्टा हा ९० हजार हेक्टरचा आहे. तो कमी करून तो ५० हजार हेक्टरचा करण्यात यावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.गोरेवाडाबाबत चर्चाबहुप्रतीक्षित नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहलयासाठीची जंगल जमीन गैर-वन-जमीनसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. या ठिकाणी प्राणीसंग्रहालय तसेच खुली सफारी बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी केंद्राकडून किती जागा दिली जाईल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तो लवकर घेतल्यास प्राणीसंग्रहालयाच्या कामास गती मिळेल. याविषयांवर आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे दवे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>अरबी समुद्रातील दूषित पाण्याबाबत उपाययोजनाअरबी समुद्रात जाणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ठोस उपाययोजना आखावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता मालाडच्या सीवरेजमधून दररोज २५ लाख लोकांचे मल व अन्य प्रदूषित जल नि:स्सारण होते त्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यसाठी केंद्राने ठोस उपाययोजना आखावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.>नवी मुंबई विमानळाच्या अटींची पूर्तता लवकरचनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत काही अटी-शर्र्थींमध्ये केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या बदलांची पूर्तता राज्याकडून लवकरच केली जाईल,असे राज्य शासनातर्फे बैठकीत सांगण्यात आले.