शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

गावागावांत विमानतळाच्या बाजूने ठराव करा

By admin | Updated: October 19, 2016 01:36 IST

‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही

भुलेश्वर : ‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सुरुवातीला पुरंदर तालुक्यात विमानतळ व्हावे, यासाठी सर्वच तयार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले व मतांचे राजकारण करत येथील दलाल विमानतळाच्या विरोधात उभे राहिले. पुरंदरचा विकास साधायचा असेल, तर गावागावांत विमानतळ होण्याच्या दृष्टीने ठराव करण्यात यावे,’’ असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील मावडी व पिंपरी येथे जलपूजन व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिवतारे बोलत होते.शिवतारे म्हणाले, की दलालांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकून त्यांना भकास केले आहे. केवळ मते मिळवण्यासाठी त्यांची डोकी फिरली आहे. विमानतळासंदर्भात चांगली भूमिका घ्या. विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना चांगले पॅकेज मिळणार आहे. जमिनीचा परतावा मिळणार असल्याने, त्या ठिकाणी कंपन्या उभारून त्यातही शेतकऱ्यांची भागीदारी राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. एम.आय.डी.सी मध्ये मोठ्याकंपन्या येतील. त्यातही तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. यामुळे पुरंदर तालुका विकासाच्या दिशेने जाणार आहे. हे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांची शंभर पिढ्यांची प्रगती होणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर तालुका शिवसेनेचे प्रमुख दिलीप यादव, अप्पासााहेब कोलते, गणेश मुळीक, माणिक निंबाळकर, धीरज जगताप, दिलीप देवकर, प्रल्हाद थेऊरकर, पांडुरंग देवकर, हरीश शेंडकर, संदीप गायकवाड, शहाजी गायकवाड, किरण साळुंखे, परिसरातील असंख्य ग्रामस्त महिला उपस्थित होत्या. या वेळी प्रल्हाद शेंडकर, रूपाली हंबीर, कलावती गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. (वार्ताहर)