शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

गावागावांत विमानतळाच्या बाजूने ठराव करा

By admin | Updated: October 19, 2016 01:36 IST

‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही

भुलेश्वर : ‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सुरुवातीला पुरंदर तालुक्यात विमानतळ व्हावे, यासाठी सर्वच तयार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले व मतांचे राजकारण करत येथील दलाल विमानतळाच्या विरोधात उभे राहिले. पुरंदरचा विकास साधायचा असेल, तर गावागावांत विमानतळ होण्याच्या दृष्टीने ठराव करण्यात यावे,’’ असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील मावडी व पिंपरी येथे जलपूजन व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिवतारे बोलत होते.शिवतारे म्हणाले, की दलालांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकून त्यांना भकास केले आहे. केवळ मते मिळवण्यासाठी त्यांची डोकी फिरली आहे. विमानतळासंदर्भात चांगली भूमिका घ्या. विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना चांगले पॅकेज मिळणार आहे. जमिनीचा परतावा मिळणार असल्याने, त्या ठिकाणी कंपन्या उभारून त्यातही शेतकऱ्यांची भागीदारी राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. एम.आय.डी.सी मध्ये मोठ्याकंपन्या येतील. त्यातही तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. यामुळे पुरंदर तालुका विकासाच्या दिशेने जाणार आहे. हे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांची शंभर पिढ्यांची प्रगती होणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर तालुका शिवसेनेचे प्रमुख दिलीप यादव, अप्पासााहेब कोलते, गणेश मुळीक, माणिक निंबाळकर, धीरज जगताप, दिलीप देवकर, प्रल्हाद थेऊरकर, पांडुरंग देवकर, हरीश शेंडकर, संदीप गायकवाड, शहाजी गायकवाड, किरण साळुंखे, परिसरातील असंख्य ग्रामस्त महिला उपस्थित होत्या. या वेळी प्रल्हाद शेंडकर, रूपाली हंबीर, कलावती गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. (वार्ताहर)