शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘मेक इन इंडिया’ खेड्यातून व्हावे

By admin | Updated: May 16, 2016 02:16 IST

किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले

अहमदनगर : महाराष्ट्राला कर्तृत्ववान उद्योजकांची मोठी परंपरा आहे़ बदलत्या काळानुसार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे विकेंद्रीकरण करावे लागेल. परदेशी उद्योजकांवर अवलंबून न राहता जनतेच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले. ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने उद्योग, व्यवसायातील कर्तृत्ववान व्यक्तींचा वेध घेणाऱ्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली आहे. शनिवारी एका समारंभात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होऊन आयकॉन्सचा गौरव करण्यात आला.फिरोदिया म्हणाले, पाठ्यपुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेख येतो़ उद्योजकांची महती मात्र कधीच आलेली दिसत नाही़ राजकारणी कलावंत यांच्याइतकेच उद्योजकांनाही महत्त्व द्यायला हवे.काळाच्या गतीने धावा : राजेंद्र दर्डाकाळासोबत धावण्यात मागे राहिलेल्या अनेक जागतिक कंपन्या आता दिसत नाहीत. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी काळाबरोबर धावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले. ते म्हणाले, स्वत:चे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या कंपन्या केवळ कल्पकतेच्या आधारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. स्वत:ची एकही टॅक्सी नसलेली उबर जगातील सर्वांत मोठी टॅक्सी आॅपरेटर कंपनी आहे. एअर बी अ‍ॅण्ड बी अर्थात ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधील एकही रुम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वांत जास्त रुम विकणारी ही सर्वांत मोठी कंपनी आहे. ‘लोकमत’ या बदलांची माहिती वाचकांपर्यंत दररोज पोहोचवत आहे.वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सीमित नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही ‘लोकमत’ची प्रारंभीपासूनची भूमिका आहे. >नवनवीन संकल्पना हेच ‘लोकमत’चे वेगळेपण : विखे‘लोकमत’ने सतत नवनवीन संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यामुळेच माध्यमक्षेत्रात या वृत्तसमूहाचे वेगळेपण व लौकिक आहे. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काढले. प्रेरणादायी उपक्रम : शिंदेगृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, ज्यांनी आयुष्यात संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले़, त्यांची ‘लोकमत’ने दखल घेत त्यांचा गौरव केला़ हा उपक्रम प्रेरणादायी आहे.