शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

‘मेक इन इंडिया’ खेड्यातून व्हावे

By admin | Updated: May 16, 2016 02:16 IST

किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले

अहमदनगर : महाराष्ट्राला कर्तृत्ववान उद्योजकांची मोठी परंपरा आहे़ बदलत्या काळानुसार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे विकेंद्रीकरण करावे लागेल. परदेशी उद्योजकांवर अवलंबून न राहता जनतेच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले. ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने उद्योग, व्यवसायातील कर्तृत्ववान व्यक्तींचा वेध घेणाऱ्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली आहे. शनिवारी एका समारंभात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होऊन आयकॉन्सचा गौरव करण्यात आला.फिरोदिया म्हणाले, पाठ्यपुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेख येतो़ उद्योजकांची महती मात्र कधीच आलेली दिसत नाही़ राजकारणी कलावंत यांच्याइतकेच उद्योजकांनाही महत्त्व द्यायला हवे.काळाच्या गतीने धावा : राजेंद्र दर्डाकाळासोबत धावण्यात मागे राहिलेल्या अनेक जागतिक कंपन्या आता दिसत नाहीत. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी काळाबरोबर धावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले. ते म्हणाले, स्वत:चे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या कंपन्या केवळ कल्पकतेच्या आधारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. स्वत:ची एकही टॅक्सी नसलेली उबर जगातील सर्वांत मोठी टॅक्सी आॅपरेटर कंपनी आहे. एअर बी अ‍ॅण्ड बी अर्थात ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधील एकही रुम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वांत जास्त रुम विकणारी ही सर्वांत मोठी कंपनी आहे. ‘लोकमत’ या बदलांची माहिती वाचकांपर्यंत दररोज पोहोचवत आहे.वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सीमित नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही ‘लोकमत’ची प्रारंभीपासूनची भूमिका आहे. >नवनवीन संकल्पना हेच ‘लोकमत’चे वेगळेपण : विखे‘लोकमत’ने सतत नवनवीन संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यामुळेच माध्यमक्षेत्रात या वृत्तसमूहाचे वेगळेपण व लौकिक आहे. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काढले. प्रेरणादायी उपक्रम : शिंदेगृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, ज्यांनी आयुष्यात संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले़, त्यांची ‘लोकमत’ने दखल घेत त्यांचा गौरव केला़ हा उपक्रम प्रेरणादायी आहे.