शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्राला बनवू जगातील सर्वोत्कृष्ट राज्य

By admin | Updated: August 16, 2015 02:53 IST

राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या

- मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत रोजगाराच्या संधी वाढवतानाच शेतकरीही जगला पाहिजे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नदाता असणारा शेतकरीच संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतील, तर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात येईल. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ७ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संकटाच्या काळात बळीराजा उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.पारदर्शक कारभारासाठी सरकारने खरेदीची नवी पध्दत स्विकारली आहे. तसेच लोकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले की, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. मुंबईतील इंदू मीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनाकडून जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.