शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

महाराष्ट्राला बनवू जगातील सर्वोत्कृष्ट राज्य

By admin | Updated: August 16, 2015 02:53 IST

राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या

- मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत रोजगाराच्या संधी वाढवतानाच शेतकरीही जगला पाहिजे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नदाता असणारा शेतकरीच संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतील, तर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात येईल. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ७ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संकटाच्या काळात बळीराजा उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.पारदर्शक कारभारासाठी सरकारने खरेदीची नवी पध्दत स्विकारली आहे. तसेच लोकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले की, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. मुंबईतील इंदू मीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनाकडून जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.