शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला बनवू जगातील सर्वोत्कृष्ट राज्य

By admin | Updated: August 16, 2015 02:53 IST

राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या

- मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत रोजगाराच्या संधी वाढवतानाच शेतकरीही जगला पाहिजे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नदाता असणारा शेतकरीच संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतील, तर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात येईल. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ७ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संकटाच्या काळात बळीराजा उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.पारदर्शक कारभारासाठी सरकारने खरेदीची नवी पध्दत स्विकारली आहे. तसेच लोकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले की, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. मुंबईतील इंदू मीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनाकडून जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.