शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

राम मंदिरासाठी कायदा करा - भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:30 IST

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर ...

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकवार हिंदुत्वाचा नारा दिला. रामजन्मभूमीचा वाद वाढण्यात राजकीय पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजयादशमीनिमित्त रेशीमबाग मैदानावर रा. स्व. संघाचा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बालकांच्या अधिकारांसाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. या वेळी पाथेय देताना भागवत म्हणाले, अयोध्येत पूर्वी मंदिर होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मात्र जागेबाबतच्या न्यायिक प्रक्रियेत नवीन बाबी उपस्थित करून निर्णय न होऊ देण्याचा काही कपटी तत्त्वांचा प्रयत्न आहे.मात्र देशाच्या आत्मगौरवाच्या दृष्टीने अयोध्येत राममंदिर बनणे आवश्यक आहेच. राम मंदिर बनल्यानंतरच देशात सद्भावना व एकात्मतेचे वातावरण निश्चितच तयार तयार होईल, असा विश्वासही सरसंघचालकांनी व्यक्त केला.

प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले आणि निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. त्या वेळी ते पाहण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. पहिल्यांदाच या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर करण्यात आले.

मतदानामध्ये ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्य:स्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभी करतील, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय होण्याचा संदेश दिला.

शबरीमालाच्या निर्णयावर नाराजीशबरीमाला देवस्थानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा आणि कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात घेतली गेली नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाजात अशांतता, अस्थिरता निर्माण झाली आहे. सातत्याने हिंदू समाजावर विनासंकोच आघात का होत आहेत, असा प्रश्नही भागवत यांनी केला.

केंद्र सरकारला काढले चिमटेकेंद्र सरकारच्या कामाच्या गतीवरूनही सरसंघचालकांनी चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीत हेच चित्र आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता दाखवत पावले उचलली गेली पाहिजेत. मात्र असे होत नसल्याचे ते म्हणाले.