शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

राम मंदिरासाठी कायदा करा - भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:30 IST

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर ...

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकवार हिंदुत्वाचा नारा दिला. रामजन्मभूमीचा वाद वाढण्यात राजकीय पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजयादशमीनिमित्त रेशीमबाग मैदानावर रा. स्व. संघाचा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बालकांच्या अधिकारांसाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. या वेळी पाथेय देताना भागवत म्हणाले, अयोध्येत पूर्वी मंदिर होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मात्र जागेबाबतच्या न्यायिक प्रक्रियेत नवीन बाबी उपस्थित करून निर्णय न होऊ देण्याचा काही कपटी तत्त्वांचा प्रयत्न आहे.मात्र देशाच्या आत्मगौरवाच्या दृष्टीने अयोध्येत राममंदिर बनणे आवश्यक आहेच. राम मंदिर बनल्यानंतरच देशात सद्भावना व एकात्मतेचे वातावरण निश्चितच तयार तयार होईल, असा विश्वासही सरसंघचालकांनी व्यक्त केला.

प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले आणि निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. त्या वेळी ते पाहण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. पहिल्यांदाच या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर करण्यात आले.

मतदानामध्ये ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्य:स्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभी करतील, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय होण्याचा संदेश दिला.

शबरीमालाच्या निर्णयावर नाराजीशबरीमाला देवस्थानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा आणि कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात घेतली गेली नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाजात अशांतता, अस्थिरता निर्माण झाली आहे. सातत्याने हिंदू समाजावर विनासंकोच आघात का होत आहेत, असा प्रश्नही भागवत यांनी केला.

केंद्र सरकारला काढले चिमटेकेंद्र सरकारच्या कामाच्या गतीवरूनही सरसंघचालकांनी चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीत हेच चित्र आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता दाखवत पावले उचलली गेली पाहिजेत. मात्र असे होत नसल्याचे ते म्हणाले.