शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी कायदा करा - भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:30 IST

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर ...

नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकवार हिंदुत्वाचा नारा दिला. रामजन्मभूमीचा वाद वाढण्यात राजकीय पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजयादशमीनिमित्त रेशीमबाग मैदानावर रा. स्व. संघाचा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बालकांच्या अधिकारांसाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. या वेळी पाथेय देताना भागवत म्हणाले, अयोध्येत पूर्वी मंदिर होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मात्र जागेबाबतच्या न्यायिक प्रक्रियेत नवीन बाबी उपस्थित करून निर्णय न होऊ देण्याचा काही कपटी तत्त्वांचा प्रयत्न आहे.मात्र देशाच्या आत्मगौरवाच्या दृष्टीने अयोध्येत राममंदिर बनणे आवश्यक आहेच. राम मंदिर बनल्यानंतरच देशात सद्भावना व एकात्मतेचे वातावरण निश्चितच तयार तयार होईल, असा विश्वासही सरसंघचालकांनी व्यक्त केला.

प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले आणि निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. त्या वेळी ते पाहण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. पहिल्यांदाच या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर करण्यात आले.

मतदानामध्ये ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्य:स्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभी करतील, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय होण्याचा संदेश दिला.

शबरीमालाच्या निर्णयावर नाराजीशबरीमाला देवस्थानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा आणि कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात घेतली गेली नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाजात अशांतता, अस्थिरता निर्माण झाली आहे. सातत्याने हिंदू समाजावर विनासंकोच आघात का होत आहेत, असा प्रश्नही भागवत यांनी केला.

केंद्र सरकारला काढले चिमटेकेंद्र सरकारच्या कामाच्या गतीवरूनही सरसंघचालकांनी चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीत हेच चित्र आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता दाखवत पावले उचलली गेली पाहिजेत. मात्र असे होत नसल्याचे ते म्हणाले.