शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

‘मेक इन इंडिया’ यशस्वी करणार

By admin | Updated: February 8, 2016 02:07 IST

‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे.

लासुर्णे : ‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले. गोखळी (ता. इंदापूर) येथे फडतरे उद्योग समूहाच्या माध्यमातून फडतरे फॅबटेक प्रा. लि.च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, सोनाई दूधचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, विठ्ठल शुगर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, हनुमंत फडतरे, मंगेश फडतरे आदी उपस्थित होते. गिते म्हणाले, की सध्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अडचणीत आली आहे. उद्योगांची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील उद्योगांचे दुसऱ्या राज्यात पलायन सुरू आहे. हे पलायन देशांतर्गत ठीक आहे. कारण उद्योग कोणत्याही राज्यात असला तरी आपल्या देशातच आहे. मात्र, देशाबाहेर उद्योग गेल्यास चिंतेची बाब आहे. तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यवसायातील रोजगार कमी झाले आहेत. यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांनी कारखानदारी क्षेत्रात उतरावे. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे म्हणाले, हा उद्योगसमूह सुरुवातीला शेती व्यवसायात उतरला. त्यानंतर शिक्षणापाठोपाठ उद्योग व आता अवजड उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. या उद्योगात चारशे ते पाचशे तरुणांना रोजगार मिळणार आहे. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले. आभार अध्यक्ष मंगेश फडतरे यांनी मानले. > आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाहीअवजड उद्योग खात्यात ३२ अवजड उद्योग येतात. त्यापैकी ११ उद्योग आजारी आहेत तर उर्वरित २१ उद्योगांची भरभराट होऊन फायदा होईल. या ११ आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. १९८७च्या नियमानुसार पगार मिळाला, त्याचप्रमाणे २००७ नियमानुसार ३५ ते ४० लाख रुपये देऊन सेवानिवृत्ती मिळणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले.मंत्राशिवाय यंत्र सुरू करत नाहीमंत्राला शरण न जाता यंत्राला शरण गेले पाहिजे, असे मत सूत्रसंचालक औदुंबर बुधावले यांनी व्यक्त केले. त्यावर केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, या मताशी आपण पूर्णपणे सहमत नाही. आपण मंत्रोच्चार केल्याशिवाय कोणतेही यंत्र सुरू होत नाही. कोणतेही मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू करत नाही. त्यामागची भावना म्हत्त्वाची आहे.