शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

विकास आराखडा सर्वसमावेशक करा

By admin | Updated: June 27, 2016 01:50 IST

मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही.

मुंबई : मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही. महापालिकेच्या बैठकीत विकास आराखड्यावरून यापूर्वी अनेकदा वादंग माजले आहेत. आराखड्यात कोस्टल रोड, प्रार्थना स्थळे, कोळीवाडे आणि गावठाणांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही. उद्याने, मोकळे भूखंड आणि मैदान याबाबत पालिकेने मांडलेले धोरण सुस्पष्ट नाही. विशेषत: आराखड्यावर पालिकेने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या असल्या तरी विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांना समजेल; अशा भाषेत नाही. परिणामी, सर्वसामान्यांना समजेल अशा रीतीने पालिकेने आराखड्याचे विश्लेषण करावे आणि मुंबईसह कुर्ला पश्चिमेकडील गावठाणांसह येथील नागरी सेवा-सुविधा सोडविण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी मुंबईकरांनी केली. निमित्त होते ते ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे.२३ जून रोजी रात्री ७.३० वाजता कुर्ला पश्चिमेकडील हॉलीक्रॉस चर्च येथे ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वॉचडॉग फाउंडेशन, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन, साऊल टीम अ‍ॅण्ड गार्डीयन्स युनायटेड आणि यूएसडब्ल्यूए या संघटनांतर्फे आयोजित या कार्यक्रमाला अ‍ॅड. व्हिविन डिसुजा आणि स्थानिक रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या वेळी मुंबईच्या विकास आरखड्यासंबंधी विशेष सादरीकरण केले. सादरीकरणात पिमेंटा यांनी कोळीवाडे, गावठाण आणि रस्त्यांसह उद्यान व मैदानांबाबत महापालिका प्रशासनाने विकास आराखड्यात केलेल्या चुकांचा पाढा वाचला; शिवाय कुर्ला येथील प्रार्थना स्थळे आणि ख्रिश्चन गाव आदींचा विकास आराखड्यात करण्यात आलेला समावेश कसा चुकीचा आहे याचे विश्लेषण उपस्थितांसमोर केले.>कोळीवाडे, गावठाणं याबाबत विकास आराखड्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मुंबई महापालिका विकास आराखड्याबाबत सर्वसामान्यांना अंधारात ठेवत आहे. विकास आराखड्यात प्रार्थना स्थळांबाबत पालिका प्रशासन आवश्यक माहिती देत नाही. आराखड्यातील आरक्षणाच्या मुद्द्यांवर तर घोळात घोळ असून, कोस्टल रोड किंवा अन्य प्रकल्पांबाबतही आराखडा सविस्तर माहिती देत नाही. परिणामी, महापालिकेने आराखडा अंतिम करताना सर्वसामान्य मुंबईकरांना किमान समजेल, अशा भाषेत तरी माहिती द्यावी; आणि सूचना-हरकती मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. अन्यथा भविष्यात कोळीवाडे-गावठाणे किंवा उद्याने-मोकळ्या जागांवर संक्रात आल्याशिवाय राहणार नाही, असेही पिमेंटा यांनी आवर्जून नमूद केले. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्यात असंख्य चुका आहेत. उद्याने आणि मैदानांचे आरक्षण चुकले आहे. सेवा रस्त्यासह कोळीवाडे, गावठाण्यांसंदर्भातील गंभीर चुका विकास आराखड्यात करण्यात आलेल्या आहेत. भूमिपुत्रांचा तर विचारच केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विकास आराखडा सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत मांडणे गरजेचे होते. परंतु पालिकेने अत्यंत शास्त्रीय किंवा सर्वसामान्यांना समजणार नाही, अशा भाषेत विकास आराखडा मांडला आहे, असे गॉडफ्रे पिमेंटा या वेळी म्हणाले.>मिठीलगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. विमानतळ प्राधिकरणालगतच्या जरीमरी, संदेश नगर आणि क्रांती नगर येथील झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. मगन नथुराम मार्ग, कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील कमानी ते साकीनाका या मार्गाचा रुंदीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही. मिठीसह नाल्यांची साफसफाई पावसाळा सुरू झाला तरी झालेली नाही. - राकेश पाटील