शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

विकास आराखडा सर्वसमावेशक करा

By admin | Updated: June 27, 2016 01:50 IST

मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही.

मुंबई : मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही. महापालिकेच्या बैठकीत विकास आराखड्यावरून यापूर्वी अनेकदा वादंग माजले आहेत. आराखड्यात कोस्टल रोड, प्रार्थना स्थळे, कोळीवाडे आणि गावठाणांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही. उद्याने, मोकळे भूखंड आणि मैदान याबाबत पालिकेने मांडलेले धोरण सुस्पष्ट नाही. विशेषत: आराखड्यावर पालिकेने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या असल्या तरी विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांना समजेल; अशा भाषेत नाही. परिणामी, सर्वसामान्यांना समजेल अशा रीतीने पालिकेने आराखड्याचे विश्लेषण करावे आणि मुंबईसह कुर्ला पश्चिमेकडील गावठाणांसह येथील नागरी सेवा-सुविधा सोडविण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी मुंबईकरांनी केली. निमित्त होते ते ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे.२३ जून रोजी रात्री ७.३० वाजता कुर्ला पश्चिमेकडील हॉलीक्रॉस चर्च येथे ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वॉचडॉग फाउंडेशन, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन, साऊल टीम अ‍ॅण्ड गार्डीयन्स युनायटेड आणि यूएसडब्ल्यूए या संघटनांतर्फे आयोजित या कार्यक्रमाला अ‍ॅड. व्हिविन डिसुजा आणि स्थानिक रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या वेळी मुंबईच्या विकास आरखड्यासंबंधी विशेष सादरीकरण केले. सादरीकरणात पिमेंटा यांनी कोळीवाडे, गावठाण आणि रस्त्यांसह उद्यान व मैदानांबाबत महापालिका प्रशासनाने विकास आराखड्यात केलेल्या चुकांचा पाढा वाचला; शिवाय कुर्ला येथील प्रार्थना स्थळे आणि ख्रिश्चन गाव आदींचा विकास आराखड्यात करण्यात आलेला समावेश कसा चुकीचा आहे याचे विश्लेषण उपस्थितांसमोर केले.>कोळीवाडे, गावठाणं याबाबत विकास आराखड्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मुंबई महापालिका विकास आराखड्याबाबत सर्वसामान्यांना अंधारात ठेवत आहे. विकास आराखड्यात प्रार्थना स्थळांबाबत पालिका प्रशासन आवश्यक माहिती देत नाही. आराखड्यातील आरक्षणाच्या मुद्द्यांवर तर घोळात घोळ असून, कोस्टल रोड किंवा अन्य प्रकल्पांबाबतही आराखडा सविस्तर माहिती देत नाही. परिणामी, महापालिकेने आराखडा अंतिम करताना सर्वसामान्य मुंबईकरांना किमान समजेल, अशा भाषेत तरी माहिती द्यावी; आणि सूचना-हरकती मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. अन्यथा भविष्यात कोळीवाडे-गावठाणे किंवा उद्याने-मोकळ्या जागांवर संक्रात आल्याशिवाय राहणार नाही, असेही पिमेंटा यांनी आवर्जून नमूद केले. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्यात असंख्य चुका आहेत. उद्याने आणि मैदानांचे आरक्षण चुकले आहे. सेवा रस्त्यासह कोळीवाडे, गावठाण्यांसंदर्भातील गंभीर चुका विकास आराखड्यात करण्यात आलेल्या आहेत. भूमिपुत्रांचा तर विचारच केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विकास आराखडा सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत मांडणे गरजेचे होते. परंतु पालिकेने अत्यंत शास्त्रीय किंवा सर्वसामान्यांना समजणार नाही, अशा भाषेत विकास आराखडा मांडला आहे, असे गॉडफ्रे पिमेंटा या वेळी म्हणाले.>मिठीलगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. विमानतळ प्राधिकरणालगतच्या जरीमरी, संदेश नगर आणि क्रांती नगर येथील झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. मगन नथुराम मार्ग, कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील कमानी ते साकीनाका या मार्गाचा रुंदीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही. मिठीसह नाल्यांची साफसफाई पावसाळा सुरू झाला तरी झालेली नाही. - राकेश पाटील