शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

भिलारला प्रकाशनाचं ‘डेस्टिनेशन’ करा!

By admin | Updated: May 4, 2017 23:31 IST

देवेंद्र फडणवीस : ग्रंथसंपदेसाठी घर उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामस्थांनाही केला मानाचा मुजरा

सातारा : ‘लोकांचे ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही. देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव असणाऱ्या भिलार गावातील सुज्ञ आणि साहित्यप्रेमी ग्रामस्थांनी ग्रंथसंपदेसाठी आपलं घर देऊन दातृत्व दाखविलं आहे. आता प्रकाशकांची जबाबदारी वाढली आहे. लोक लग्नासाठी जयपूरसारखं ‘डेस्टिनेशन’ निवडतात. अगदी त्याच पद्धतीने प्रकाशकांनी साहित्याच्या प्रकाशनासाठी भिलार गावाला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सभापती रूपाली राजपुरे, सरपंच वंदना भिलारे, बाळासाहेब भिलारे, विक्रम पावसकर, अतुल भोसले, आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात वाचन संस्कृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, ‘मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना इतिहासदेखील रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही, एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृती ही संपू शकत नाही.’विदेशात नेते मजा मारायला जात नाहीत : तावडे‘सजग, संवेदनशील समाजाची पायाभरणी करणारा ‘भिलार पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प आहे. नेते विदेश दौरे करतात, त्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, विदेशाचा दौरा करताना डोळसपणे पाहिल्यामुळेच ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प सुचला होता. मी मागच्या सरकारकडे पुस्तकांच्या गावासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी यश आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते शक्य झाले. त्यामुळे नेते विदेशात मजा मारायला जात नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे,’ असा चिमटा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बघत आपल्या भाषणात काढला. भिलार (ता. महाबळेश्वर) या ‘पुस्तकाचं गाव’ योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी डावीकडून संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री महादेव जानकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले उपस्थित होते.