शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिलारला पुस्तक प्रकाशनस्थळ करा

By admin | Updated: May 5, 2017 03:54 IST

‘लोकांचे ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही. देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव

सातारा : ‘लोकांचे ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही. देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव असणाऱ्या भिलार गावातील सुज्ञ आणि साहित्यप्रेमी ग्रामस्थांनी ग्रंथसंपदेसाठी आपले घर देऊन दातृत्व दाखवलं आहे. आता प्रकाशकांची जबाबदारी वाढली आहे. लोक लग्नासाठी जयपूरसारखं ‘डेस्टिनेशन’ निवडतात. अगदी त्याच पद्धतीने प्रकाशकांनी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी भिलार गावाला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी महाबळेश्वरजवळील भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात वाचन संस्कृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना इतिहासही रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही. एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृती संपू शकत नाही. (प्रतिनिधी) विदेशात नेते मजा मारायला जात नाहीत - तावडे‘सजग, संवेदनशील समाजाची पायाभरणी करणारा हा प्रकल्प आहे. नेते विदेश दौरे करतात, त्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, विदेशाचा दौरा करताना डोळसपणे पाहिल्यामुळेच ‘पुस्तकाचे गाव’ हा प्रकल्प सुचला होता. त्यामुळे नेते विदेशात मजा मारायला जात नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे,’ असा चिमटा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला.