शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

संसदेच्या कामकाजाचे वार्षिक कॅलेंडर बनावे

By admin | Updated: January 8, 2015 01:27 IST

संसदेचे कामकाज वर्षातून किमान १०० दिवस चालले पाहिजे. यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करून वेळापत्रक निर्धारित करण्याची गरज आहे. जर कॅलेंडर बनले तर पंतप्रधान आणि मंत्र्यांचे विदेशदौरे

नागपूर : संसदेचे कामकाज वर्षातून किमान १०० दिवस चालले पाहिजे. यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करून वेळापत्रक निर्धारित करण्याची गरज आहे. जर कॅलेंडर बनले तर पंतप्रधान आणि मंत्र्यांचे विदेशदौरे आणि राज्यातील निवडणुकांच्या कारणांमुळे कामकाज प्रभावित होण्याचा क्रम समाप्त होईल, असे मत माकपाचे ज्येष्ठ नेते व खासदार सीताराम येचुरी यांनी ‘संसद में व्यवधान : सामान्य सोच और हकीकत’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केले. संसदेचे कामकाज प्रभावित होऊ नये, हाच माझा प्रयत्न असतो. परंतु गोंधळामुळे कामकाज स्थगित होणे हे वाढत आहे. राज्यांतील विधानसभांमधील चित्र तर याहून वाईट आहे. सत्तापक्ष मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे कामकाजाचे कॅलेंडर तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे निवडणूक आयोग अधिवेशनाच्या काळात निवडणुका घेणार नाही व या कालावधीत विदेश दौरेदेखील होणार नाही, असे येचुरी म्हणाले. यावेळी येचुरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. केंद्रातील मंत्री वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. धर्मांतरण आणि घरवापसी यासारखे मुद्दे तापले आहेत. अशास्थितीत विरोधकांकडून केवळ सरकारला उत्तर मागण्यात येत होते. वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होती. परंतु मंत्र्यांनी क्षमा मागितली आहे इतकेच पंतप्रधानांनी म्हटले. धर्मांतरणाच्या मुद्यावर राज्यसभेत गोंधळ सुरू असताना मोदी यांना तब्बल एक तास मौन बाळगावे लागले, याकडे येचुरी यांनी लक्ष वेधले.लोकसभेच्या सदस्याला हिरव्या रंगाचे तर राज्यसभेच्या सदस्याला लाल रंगाचे कार्ड मिळते. यातून हे स्पष्ट होते की, राज्यसभेचे काम विधेयक रोखणे आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे अध्यादेश जारी करण्यात येत आहेत. ही कृती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना विश्वासात न घेता थेट बुलडोझर चालविण्याच्या वृत्तीमुळे गदारोळ होतो. संसदेत चर्चा हा यावरील मार्ग आहे. सरकारने चर्चेपासून घाबरणे योग्य नाही, असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)पेट्रोल ५० रु. तर डिझेल ३० रु. लिटर व्हावेआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे सरकारला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याऐवजी अबकारी शुल्कात दोनदा वाढ केली. तेलाच्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचे दर ५० रुपये आणि डिझेलचे दर ३० रुपये व्हावे. विरोधी पक्ष अशी मागणी करीत असेल तर विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाही, असा आरोप होतो. तो चुकीचा आहे, असा दावा येचुरी यांनी केला.कुठल्या भाषेत बोलू?सीताराम येचुरी यांनी आपले बोलणे सुरू करण्याअगोदर नेमक्या कुठल्या भाषेत बोलू, अशी उपस्थितांना विचारणा केली. तेलगू कुटुंबात जन्म झाल्याने तेलगू भाषा येते. तामिळनाडूत राहिल्याने तामिळ येते. बंगालमध्ये शिक्षण झाले त्यामुळे बंगालीदेखील येते. इंग्रजी व हिंदी तर येतेच. त्यामुळे तुम्हीच सांगा मी कुठल्या भाषेत बोलू असे त्यांनी विचारताच सभागृहातून ‘हिंदी-हिंदी’ असे त्यांना उत्तर मिळाले व त्यांनी हिंदीतून आपले विचार मांडले.